Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना


ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल रोजी ‘जागतिक वसुंधरा दिन’ (Earth Day) साजरा केला जात असून ‘आमची ऊर्जा आमची वसुंधरा’ हे या वर्षीचे घोषवाक्य असले तरी वाढत पृथ्वीचे तापमान धोक्याची घंटा आहे. यामागे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढणे हे एक मुख्य कारण आहे. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रेस ऑक्साईड यासारख्या वायूंमुळे उष्णतेचा अडथळा होतो आणि त्यामुळे तापमानात वाढ, वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या आपत्तीच्या घटना वाढल्या आहेत. मुंबई, ठाणे यांसारख्या शहरी भागात या वर्षी तापमान ४० अंशांपर्यंत गेले. ऋतूंचा ठरलेला क्रम ढासळत चालल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) हिमनद्या वितळत आहेत, समुद्रसपाटी वाढते आहे आणि त्यामुळे किनारपट्टी भागांना धोका निर्माण झाला आहे. ओझोन थरही कमी होत आहे, जो पृथ्वीवर येणाऱ्या घातक किरणांपासून आपले रक्षण करतो. त्वचाविकार, डोळ्यांचे विकार हे याचे परिणाम आहेत.



पर्यावरण तज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांच्या मते, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ३०० पीपीएम असावे, सध्या ते ५०० पीपीएमपेक्षा जास्त झाले आहे. हे वाढलेले प्रमाण ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार ठरत आहे. यामुळे हिमनद्या वितळत आहेत, ओझोन थर कमी होत आहे व त्वचा विकार, मोतीबिंदूसारखे आजार वाढत आहेत.


लक्झरी जीवनशैली पर्यावरणविरोधी बनत चालली आहे. फ्रिज, एसी, औषध फवारण्या, विमानप्रवास यातून क्लोरोफ्लोरोकार्बन वायू बाहेर पडतो, जो ओझोन थर नष्ट करतो. त्यामुळे पृथ्वीवर अधिक प्रमाणात यूव्ही किरणे पोहोचतात. शहरी भागांमध्ये माणसागणिक वाहने आहेत. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड यांसारखे वायू हवेत मिसळून उष्मा वाढवत आहेत. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा न केल्यामुळे मिथेनसारखा वायू निर्माण होतो.


ऊर्जेला फक्त उपभोगाचे साधन न मानता तिचा योग्य सन्मान करावा. हवा तेवढाच आणि आवश्यक असेल तेव्हाच वापर करावा. वृक्षसंख्या वाढली की आपसुकच ऊर्जेचा वापर कमी होईल. आमचे प्रेम पारंपरिक ऊर्जेवर जास्त असून, वृक्षांवर कमी आहे. मात्र याचा विपरीत परिणाम पृथ्वीवर होऊन तापमान वाढत आहे.
- डॉ. नागेश टेकाळे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे