Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना


ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल रोजी ‘जागतिक वसुंधरा दिन’ (Earth Day) साजरा केला जात असून ‘आमची ऊर्जा आमची वसुंधरा’ हे या वर्षीचे घोषवाक्य असले तरी वाढत पृथ्वीचे तापमान धोक्याची घंटा आहे. यामागे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढणे हे एक मुख्य कारण आहे. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रेस ऑक्साईड यासारख्या वायूंमुळे उष्णतेचा अडथळा होतो आणि त्यामुळे तापमानात वाढ, वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या आपत्तीच्या घटना वाढल्या आहेत. मुंबई, ठाणे यांसारख्या शहरी भागात या वर्षी तापमान ४० अंशांपर्यंत गेले. ऋतूंचा ठरलेला क्रम ढासळत चालल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) हिमनद्या वितळत आहेत, समुद्रसपाटी वाढते आहे आणि त्यामुळे किनारपट्टी भागांना धोका निर्माण झाला आहे. ओझोन थरही कमी होत आहे, जो पृथ्वीवर येणाऱ्या घातक किरणांपासून आपले रक्षण करतो. त्वचाविकार, डोळ्यांचे विकार हे याचे परिणाम आहेत.



पर्यावरण तज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांच्या मते, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ३०० पीपीएम असावे, सध्या ते ५०० पीपीएमपेक्षा जास्त झाले आहे. हे वाढलेले प्रमाण ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार ठरत आहे. यामुळे हिमनद्या वितळत आहेत, ओझोन थर कमी होत आहे व त्वचा विकार, मोतीबिंदूसारखे आजार वाढत आहेत.


लक्झरी जीवनशैली पर्यावरणविरोधी बनत चालली आहे. फ्रिज, एसी, औषध फवारण्या, विमानप्रवास यातून क्लोरोफ्लोरोकार्बन वायू बाहेर पडतो, जो ओझोन थर नष्ट करतो. त्यामुळे पृथ्वीवर अधिक प्रमाणात यूव्ही किरणे पोहोचतात. शहरी भागांमध्ये माणसागणिक वाहने आहेत. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड यांसारखे वायू हवेत मिसळून उष्मा वाढवत आहेत. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा न केल्यामुळे मिथेनसारखा वायू निर्माण होतो.


ऊर्जेला फक्त उपभोगाचे साधन न मानता तिचा योग्य सन्मान करावा. हवा तेवढाच आणि आवश्यक असेल तेव्हाच वापर करावा. वृक्षसंख्या वाढली की आपसुकच ऊर्जेचा वापर कमी होईल. आमचे प्रेम पारंपरिक ऊर्जेवर जास्त असून, वृक्षांवर कमी आहे. मात्र याचा विपरीत परिणाम पृथ्वीवर होऊन तापमान वाढत आहे.
- डॉ. नागेश टेकाळे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ

Comments
Add Comment

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा