Namo Bharat: नमो भारत ट्रेन १६० किमी प्रतितास वेगाने धावेल, बिहारमधील ग्रामिण भागाचे स्वप्न सत्यात उतरेल!

  56

पाटणा : नमो भारत रॅपिड ट्रेन १६० किमी वेगाने धावणारी, जयनगर सीमावर्ती भागातील लोकांना राजधानी पाटणाशी थेट जोडणी प्रदान करणारी, शिवाय प्रवाशांना सोयीस्कर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देखील देईल. ही ट्रेन प्रवाशांसाठी हलक्या, पॅडेड सीट्स, ऑटोमॅटिक दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि टक्करविरोधी चिलखत प्रणाली यासारख्या आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.

ज्या सीमावर्ती भागात वर्षानुवर्षं विकास फक्त भाषणांमध्येच दिसला, तिथून आता राजधानी पाटणापर्यंतचा प्रवास मोदी सरकारच्या इच्छाशक्तीमुळे केवळ काही तासांत होणार आहे.



काय आहे ही ‘नमो भारत’ ट्रेन?


जयनगरसारख्या दूरवरच्या सीमावर्ती जिल्ह्यातून पाटणाशी थेट जोडणी देणारी १६० किमी प्रतितास वेगाने धावणारी ‘नमो भारत’ रॅपिड ट्रेन आता प्रत्यक्षात धावणार आहे. ही ट्रेन फक्त वेगाने धावणार नाही, तर स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देखील देणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी काय काय?

  • पॅडेड, हलक्या सीट्स,

  • सीसीटीव्ही सुरक्षा,

  • टक्करविरोधी संरचना,

  • स्वयंचलित दरवाजे,

  • अ‍ॅल्युमिनियम सामान रॅक,

  • मोबाईल चार्जिंग पॉइंट,

  • एलसीडी डिस्प्ले,

  • डिफ्यूज्ड एलईडी लाईटिंग,

  • आणि कोचमधून कोचमध्ये जाण्यासाठी सीलबंद गॅंगवे

  • यामुळे केवळ वेगच नाही, तर आरामदायी, आधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचीही हमी मिळते.

  • महिलांसाठी विशेष कोच – सक्षमीकरणाची दिशा


नमो भारत ट्रेनमध्ये महिलांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी एका खास कोचची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र कोचची सोय ही केवळ सोयीसाठी नाही, तर सुरक्षिततेची खात्री आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे.

वाहतूक आणि पर्यावरणावर परिणाम?


ही ट्रेन रस्त्यांवरील वाहतूक कमी करेल, प्रदूषण आणि अपघात टाळेल, त्यामुळे ती हरित आणि शाश्वत वाहतूक प्रणाली ठरणार आहे. ‘नमो भारत’ ट्रेन मिथिला आणि समस्तीपूरसारख्या भागांतील जनतेसाठी अभिमान, कनेक्टिव्हिटी आणि प्रगतीचं प्रतीक आहे. या ट्रेनमुळे स्थानिकांना रोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सांस्कृतिक संधींचा नवा अध्याय खुला होईल. मोदी सरकारचे हे ऐतिहासिक पाऊल राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला नवीन उंचीवर नेण्यास मदत करेल.
Comments
Add Comment

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या