अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात प्रामुख्याने व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे आयात शुल्क धोरण जाहीर केल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम दिसले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर येत आहेत.



भारत आणि अमेरिका चर्चेतून दोन्ही देशांचे हित साधणारा नवा व्यापार करार करण्यास उत्सुक आहेत. यामुळे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या दौऱ्यात काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.



भारत दौऱ्यात उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. यावेळी प्रामुख्याने अर्थव्यवस्था, व्यापार आणि भू-राजकीय संबंधांवर चर्चा होणार आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. यानंतर उपाध्यक्ष जेडी व्हान्स २२ एप्रिल रोजी जयपूर आणि २३ एप्रिल रोजी आग्रा येथे भेट देणार आहेत.



भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या १९० अब्ज डॉलर एवढा मोठा व्यापार आहे. हा व्यापार वाढवणे आणि व्यापारातून दोन्ही देशांचे जास्तीत जास्त हित साधणे यासाठी नव्याने काही मुद्यांवर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचा प्रयत्न २०३० पर्यंत व्यापार ५०० अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचा आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प आणि मोदी यांच्यात वैयक्तिक मैत्री निर्माण झाली. यातून पुढे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास मदत झाली होती. यामुळे पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या आणि ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात