राहुल गांधींच्या मनावर परिणाम झालाय! भारताची बदनामी कुणाच्या अजेंड्यावर?

Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

मुंबई : “राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने परदेशात जाऊन भारताची, लोकशाही संस्था आणि संविधानाची बदनामी करत आहेत. निवडणुकीत सातत्याने पराभूत झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालाय,” अशी थेट टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षाचा नेता म्हणून जर कोणी परदेशात जाऊन देशाचं नाव खराब करत असेल, तर तो कोणाचा अजेंडा राबवतोय, हा संशय निर्माण होतो. त्यांना पराभव पचलेला नाही, म्हणून राहुल गांधी निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीवरच प्रश्न उपस्थित करत आहेत. हा केवळ बालिशपणा आहे.”

ते पुढे म्हणाले, “राहुल गांधींनी देशात राहून काम करावं, जनतेत विश्वासार्हता निर्माण करावी. परदेशात फिरून भारताची निंदा करून मते मिळणार नाहीत. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली,  कुठेही त्यांना यश मिळालेलं नाही. आता तरी त्यांनी भारताची बदनामी करणं थांबवावं.”

दरम्यान, भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही राहुल गांधींवर टीका करताना म्हटलं, “राहुल गांधी हे लोकशाहीविरोधी आहेत. जे भारतीय मतदारांचा विश्वास जिंकू शकले नाहीत, तेच लोक परदेशातून भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उभे करत आहेत. जॉर्ज सोरोसच्या अजेंड्यावर राहुल गांधी काम करतायत का?”

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

23 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago