Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या 'या' गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे. या अशा वातावरणात जशी उन्हापासून डोक्याची आणि त्वचेची काळजी घेतो तशीच डोळ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. बरेच लोक उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सनग्लासेस घालतात. सर्वच सनग्लासेस डोळ्यांचे रक्षण करण्यास सक्षम असतात असे नाही. काही जण संधीचा गैरफायदा घेऊन सनग्लासच्या नावाखाली निकृष्ट गॉगल विकण्याचाही उद्योग करतात. यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने सनग्लासेस घेणे हिताचे आहे.

उन्हाळ्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. अशा परिस्थितीत डोळे चोळल्याने डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. सनग्लासेस डोळ्यांना सूर्याच्या तीव्र प्रकाशापासून वाचवतात. पण लोकांना हे माहित नसतं की कोणता सनग्लास घ्यायला पाहिजे. ज्यामुळे ते चुकीचा चष्मा निवडतात. यामुळे आराम मिळण्याऐवजी डोळ्यांना इजा होते.


कोणते सनग्लासेस घालावे?


उन्हाळ्यात सूर्यप्रकाश खूप प्रखर असतो. तेजस्वी सूर्यप्रकाशात अतिनील किरणे देखील असतात. या किरणांमुळे डोळ्यांच्या आरोग्याला गंभीर नुकसान होते. या किरणांपासून बचाव करण्यासाठी, चांगल्या दर्जाचे यूव्ही संरक्षित सनग्लासेस वापरावेत. सनग्लासेस खरेदी करताना, तुम्ही ते पूर्णपणे तपासले पाहिजेत. असे अनेक सनग्लासेस आहेत जे फक्त दाखवण्यासाठी आहेत. असे सनग्लासेस घालण्याचा काही फायदा नाही. यासोबतच, योग्य फ्रेम निवडणे देखील महत्त्वाचे आहे. फ्रेम तुमच्या चेहऱ्यावर चांगली दिसली पाहिजे आणि तुमचे डोळे व्यवस्थित झाकले पाहिजेत.
Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल

दीपिकाच्या आठ तास कामाच्या अटीवर कियाराची प्रतिक्रिया, मातृत्वाबद्दल काय सांगतेय अभिनेत्री?

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सिनेसृष्टीत आठ तासांच्या कामाची मागणी केल्यामुळे बऱ्याच

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत