Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या 'या' गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे. या अशा वातावरणात जशी उन्हापासून डोक्याची आणि त्वचेची काळजी घेतो तशीच डोळ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. बरेच लोक उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सनग्लासेस घालतात. सर्वच सनग्लासेस डोळ्यांचे रक्षण करण्यास सक्षम असतात असे नाही. काही जण संधीचा गैरफायदा घेऊन सनग्लासच्या नावाखाली निकृष्ट गॉगल विकण्याचाही उद्योग करतात. यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने सनग्लासेस घेणे हिताचे आहे.

उन्हाळ्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. अशा परिस्थितीत डोळे चोळल्याने डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. सनग्लासेस डोळ्यांना सूर्याच्या तीव्र प्रकाशापासून वाचवतात. पण लोकांना हे माहित नसतं की कोणता सनग्लास घ्यायला पाहिजे. ज्यामुळे ते चुकीचा चष्मा निवडतात. यामुळे आराम मिळण्याऐवजी डोळ्यांना इजा होते.


कोणते सनग्लासेस घालावे?


उन्हाळ्यात सूर्यप्रकाश खूप प्रखर असतो. तेजस्वी सूर्यप्रकाशात अतिनील किरणे देखील असतात. या किरणांमुळे डोळ्यांच्या आरोग्याला गंभीर नुकसान होते. या किरणांपासून बचाव करण्यासाठी, चांगल्या दर्जाचे यूव्ही संरक्षित सनग्लासेस वापरावेत. सनग्लासेस खरेदी करताना, तुम्ही ते पूर्णपणे तपासले पाहिजेत. असे अनेक सनग्लासेस आहेत जे फक्त दाखवण्यासाठी आहेत. असे सनग्लासेस घालण्याचा काही फायदा नाही. यासोबतच, योग्य फ्रेम निवडणे देखील महत्त्वाचे आहे. फ्रेम तुमच्या चेहऱ्यावर चांगली दिसली पाहिजे आणि तुमचे डोळे व्यवस्थित झाकले पाहिजेत.
Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय