Rajeshwari Kharat Religion : फॅण्ड्री फेम ‘शालू’ने धर्म बदलून केला ‘या’ धर्माचा स्वीकार!

Share

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘फॅण्ड्री’ (Fandry Movie) हा चित्रपट खूप गाजला होता. ‘फॅण्ड्री’ या चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात(Rajeshwari Kharat) ला खूप लोकप्रियता मिळाली. आजही प्रेक्षक किंवा चाहते राजेश्वरीला जब्याची शालू म्हणून ओळखतात. चित्रपटानंतरही राजेश्वरी ग्लॅमरस फोटोंमुळे आणि आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत येत असते. कधी कधी चित्रपटांमध्ये दिसणारे कलाकार प्रेक्षक आणि त्यांच्या चाहत्यांवर बरेचदा प्रभाव टाकत असतात. आपला आवडता कलाकार जसं करेल तसंच आपण सुद्धा अनुकरण करायचं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळेच प्रेक्षक कलाकारांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलो करत असतात. अशातच लोकप्रिय आणि ‘फॅण्ड्री’ चित्रपटामधली शालू म्हणजेचं राजेश्वरी खरात एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं सांगितलं आहे.

नागराज मंजुळे यांच्या सुपरहिट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातबाबत एक खळबळ जनक माहिती समोर आली आहे. फॅन्ड्री मधून राजेश्वरी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर सुद्धा ती बऱ्याच प्रोजेक्टमध्ये दिसलेली. राजेश्वरी अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. जे बरेचदा चर्चेचा विषय देखील बनतात. पण आता राजेश्वरीची एका भलत्याच कारणामुळे चर्चा चालू असून चाहते ही तिच्यावर नाराज आहे.

अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती पाण्यामध्ये हात जोडून उभी आहे. तिने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, बाप्तिस्मा स्वीकारलं. याशिवाय तिने एक ग्रुप फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, परमेश्वर म्हणतो की, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत, ज्या मला माहित आहे. हॅशटॅगमध्ये तिने नवीन सुरूवात. बाप्तिस्मा स्वीकारल्याचे सांगितले आहे. या फोटोतून स्पष्ट होतंय की, अभिनेत्रीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. मात्र तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चाहत्यांची नाराजी

राजेश्वरीच्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. एका नेटकरी युजरने लिहिलंय की, ख्रिश्चिन धर्मापेक्षा ही प्राचीन आणि सुंदर असा बुद्धाचा धर्म असताना दूसऱ्या धर्माची गरज लागतेच कशाला..? बाबासाहेबांनी तब्बल २५ वर्ष अभ्यास करून हा भारतीय मूळ असलेला धर्म दिला तो असेच नव्हे..! तुमच्यापेक्षा गरीब लोक बरे जे स्वाभिमानी असतात. दुसऱ्या एकाने लिहिले की, काळी चिमणी घालवली लगा….. बऱ्याच लोकांनी अनफॉलो अशी कमेंट केली आहे. तर एकाने ‘कदाचित शूटिंग आहे, लई लोड घेऊ नका… चर्चेत येण्यासाठो केलेला एक निरागस स्टंट वाटतोय.. बाकी काही नाही असा विश्वाससुद्धा दाखवला आहे.

Recent Posts

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

43 minutes ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

3 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

4 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

4 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

5 hours ago