Female Police Officer Ashwini Bidre : कधी काळी राष्ट्रपतींकडून कौतुक करुन घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेप, महिला सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी शिक्षा

  90

मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार आहे. न्याय सर्वांना समान आहे. कायदा हाती घेतला तर शिक्षा ही होणारच यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हिची २०१६ मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अश्विनी बिद्रे यांचा लिव्ह इन पार्टनर, अभय कुरंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पोलीस अधिकारी असूनही अश्विनी यांची हत्या झाल्याचे अनेक दिवस समजले नव्हते. अभय कुरंदकर पोलिसांना आणि अश्विनी यांच्या कुटुंबियांना अंधारात ठेवण्यात यशस्वी झाला होता. पण अखेर सत्य उजेडात आलं. यानंतर आता अभय कुरंदकरला हत्येप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर त्याचे सहकारी कुदंन भंडारी आणि महेश फळणीकर यांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अश्विनीच्या नातलगांना पहिल्यांदा न्याय झाल्यासारखं वाटलं.


महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे ही लिव्ह इन पार्टनर अभय कुरंदकर सोबत एकत्र राहत होती. त्यांच्यात झालेल्या वादाला कंटाळून नराधम अभय कुरंदकरने अश्विनी बिद्रेची हत्या केली. कुऱ्हाडीने तिचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकून दिले. या गुन्ह्याची कबुली अभय कुरंदकरने दिल्यानंतर या कटात सामील असलेल्या त्याच्या साथीदारांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. अश्विनी यांच्या कुटुंबाचा लढा अखेर आज यशस्वी झाला. पनवेल सत्र न्यायालयाने आजच्या सुनावणीत अभय कुरंदकरला अश्विनीची हत्या करणे, तिच्या शरीराचे तुकडे करणे, आणि पुरावे नष्ट करून खून लपवण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.



काय आहे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण ?


अभय कुरुंदकर हे मुंबई पोलिसांत अधिकारी होते. त्यांना राष्ट्रपती पदक सुद्धा मिळालं होतं. कुरुंदकर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अश्विनी बिद्रेच्या प्रेमात पडले. पण २००५ साली अश्विनी बिद्रेचं लग्न राजू गोरे नावाच्या व्यक्तीशी झालं. लग्नाच्या दोन वर्षांनी तिने महाराष्ट्र पीएससी उत्तीर्ण केली आणि पोलिसात सब-इन्स्पेक्टर झाली. तिचं पहिलं पोस्टिंग पुण्यात झालं. तीन वर्षांनंतर, अश्विनीची सांगलीला बदली झाली.


अश्विनीची हत्या झाली तेव्हा तिची मुलगी अवघ्या ६ वर्षांची होती. अश्विनीची पोस्टिंग रत्नागिरी येथे २०१३ मध्ये झाली. कुरुंदकरचे लग्न झालेले असूनसुद्धा तो अश्विनीसोबत लिव-इन पार्टनर म्हणून राहत होता. दोघांच्याही घरी याची कल्पना होती. अश्विनी २०१४ मध्ये तिच्या पतीपासून वेगळी झाली. मात्र अभयच्या घरी या घडामोडीची माहिती नव्हती.


अभय आणि अश्विनी नवी मुंबईत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. अश्विनीला २०१५ मध्ये बढती मिळाली आणि ती सहाय्यक पोलिस निरीक्षक बनली. बढती झाल्यानंतर ती ११ एप्रिल २०१६ रोजी बेपत्ता झाली. अश्विनीच्या भावाला आनंदला १५ एप्रिल रोजी फोनवर मेसेज आला की ती काही कामासाठी उत्तर प्रदेशला जात आहे आणि एका आठवड्यानंतर परत येईल. मेसेज आल्यामुळे अश्विनीच्या घरचे निवांत होते. मात्र एक दिवस अचानक अश्विनीच्या वडिलांना नवी मुंबई पोलिस मुख्यालयातून मोबाईलवर फोन आला आणि त्यांच्याकडे अश्विनीबद्दल चौकशी करण्यात आली.


अश्विनी दोन महिन्यांपासून कामावर आली नाही, असे त्यांना सांगण्यात आलं. पण कोल्हापुरात राहणाऱ्या अश्विनीच्या कुटुंबाला याबद्दल काहीच माहिती नव्हते. यानंतर अश्विनीचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना अभय आणि अश्विनी यांच्या नात्याबद्दल स्पष्टता मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अभयची चौकशी केली पण त्यांना काहीच सापडले नाही. काही दिवसांनी तपासादरम्यान पोलिसांना अश्विनीच्या लॅपटॉपमधून काही पुरावे सापडले ज्यावरून दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. पोलिसांना लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओही सापडला ज्यामध्ये अभय अश्विनीला मारहाण करताना दिसला होता. तब्बल १० महिन्यांच्या तपासानंतर अभयने शरणागती पत्करली आणि अश्विनीचा खून केल्याची कबुली दिली.


अश्विनी आपल्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, असे अभयने पोलिसांना सांगितलं. पण आपली इमेज जपण्यासाठी अभय हा त्याची पत्नी आणि मुलांना सोडण्यास तयार नव्हता. याच मुद्यावरून झालेल्या भांडणादरम्यान अभयने अश्विनीचा खून केला. कुऱ्हाडीने तिचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकून दिले असल्याचं कबुल केलं. या घटनेनंतर अश्विनीच्या कुटुंबाने आणि तिच्या मुलीने आईला न्याय मिळावा यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. तब्बल ९ वर्षांनी न्यायालयीन लढाईत त्यांना यश मिळालं आहे. अश्विनीच्या मारेकऱ्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना पनवेल न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

Comments
Add Comment

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची