Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे 'हे' पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करत आहे. मात्र शरीरातील उष्णतेची काळजी घेण्यासाठी आहारात काही पदार्थांचा शक्यतो समावेश करू नये. या आहारामुळे डिहायड्रेशन, उष्णतेचा ताण यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. खरंतर, उन्हाळ्यात भूक आणि तहान जास्त लागते. उष्णता, कडक उन्हामुळे आणि आर्द्रतेमुळे भूक कमी होते आणि त्यामुळे खाण्याची आणि पिण्याची इच्छा देखील कमी होते. अशात पालेभाज्या, फळे खाणे योग्य राहील. तसेच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने चक्कर येणे, थकवा जाणवणे या प्रकारचा त्रास होत नाही.



पुढील पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात :-


मसालेदार
मसालेदार पदार्थांमुळे शरीरातील उष्णता वाढते. यामुळे पोटात जळजळ, आम्लपित्त आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात . उन्हाळ्यात फक्त हलके मसालेदार पदार्थच खावेत, कारण मिरची, लवंग, दालचिनी, जिरे, वेलची यांसारखे मसाले शरीराची उष्णता वाढवू शकतात.


तळलेले अन्न
उन्हाळ्यात तळलेले अन्न खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढते. याशिवाय, तळलेल्या अन्नातही कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.


फास्ट फूड
आजकाल लोकांना बाहेरचे जेवण खूप आवडते, ज्यामध्ये फास्ट फूड जास्त खाणे पसंत केले जाते. पण, फास्ट फूडमध्ये पीठ, तेल आणि मसाले जास्त प्रमाणात असतात. या गोष्टी शरीरासाठी हानिकारक आहेत आणि उन्हाळ्यात त्या टाळल्या पाहिजेत.


चहा आणि कॉफी
उन्हाळ्यात जास्त चहा आणि कॉफीचे सेवन करू नये, कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॅफिन शरीराला डिहायड्रेट करते आणि शरीराचे तापमान वाढवते.


मांसाहारी
उन्हाळ्यात मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे, कारण मांसाहारी पदार्थ पचायला वेळ लागतो. यामुळे शरीरात उष्णता वाढते, ज्यामुळे तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो.

Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे 'ईटीएस' सर्वेक्षण

राज्यातील अवैध उत्खननावर 'एसआयटी'चा हातोडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा मुंबई :