Best Bus : 'बेस्ट' बस का पडतेय आजारी ?

मुंबई : मुंबईची पहिली जीवनवाहिनी रेल्वे आणि दुसरी जीवनवाहिनी बेस्ट उपक्रमाची बस सेवा आहे. मुंबईत नोकरी ,व्यवसाय, शिक्षण तसेच वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने हजारो नागरिक दररोज बसने प्रवास करतात. रेल्वे एकाच वेळी काही हजार लोकांना घेऊन प्रवास करत असते. त्या तुलनेत बेस्टच्या बस एकावेळी साधारण ५० ते १०० जणांना घेऊनच प्रवास करू शकतात. रेल्वे फक्त रुळांवरच धावते. तर बेस्टच्या बस मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. यामुळे बसने अनेकजण प्रवास करतात. पण एवढी महत्त्वाची असलेली ही बेस्ट उपक्रमाची बस सेवा मागील काही वर्षांपासून आजारी आहे.


बेस्ट उपक्रमाच्या बसचा कधी अपघात होतो तर कधी आगीत 'बेस्ट बसचा जीव गुदरमतो. याचं कारण म्हणजे योग्य पद्धतीने देखभाल-दुरुस्ती न करणे; असे वाहतूक तज्ज्ञ सांगतात.



बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या कमी झाली असून, कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या बसगाड्यांची संख्या वाढत आहे. ताफ्यातील एकूण बसच्या तुलनेत सुमारे ७३ टक्के बसगाड्या कंत्राटदारांच्या आहेत. परंतु, यापैकी बहुसंख्य बसगाड्या नादुरूस्त असून, योग्य पद्धतीने देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने त्या सतत बिघडत आहेत. त्याचबरोबर अधूनमधून या बसगाड्यांना आग लागत आहे. यामुळे कंत्राटदारांच्या बसगाड्या बेस्टसाठी तापदायक ठरू लागल्या आहेत.बेस्ट उपक्रमात २०१९ पासून भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्यास सुरुवात झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत भाडेतत्त्वावरील बसगाड्यांबाबत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या. तसेच मागील काही कालावधीपासून बसगाडीला आग लागणे, बस रस्त्यात बंद पडणे, विद्युत बॅटरी पेट घेणे अशा घटना घडत आहेत. सुदैवाने आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर कोणतीही जीवित हानी झालेली नाही. असे असले तरी वारंवार घडणारे हे प्रकार बंद होण्यासाठी योग्य पद्धतीने देखभाल-दुरुस्ती होणे गरजेचं आहे; असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

प्रभादेवीतील साई सुंदर नगर आणि कामगार नगर दाेनमधील नाल्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी विकासकाची केली नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील प्रभादेवी येथील साई

पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्पाचा पैसा वळवला रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी

रस्त्याचा निधी कमी पडल्याने तब्बल २५० कोटी रुपये करावे लागले वळते मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई

अतिरिक्त आयुक्त डॉ ढाकणे यांच्याकडे मालमत्ता विभागासह पर्यावरणाचीही जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी डॉ अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. डॉ

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भाषणाची सुरुवात करताना लक्षात ठेवा 'हे' मुद्दे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. या

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या