Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक! 

  34

नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय!


नाशिक : एप्रिल महिन्याला सुरुवात होताच तापमानाचा (Nashik Temperature) पारा चांगलाच वाढला आहे. राज्यभरात वाडत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून अनेकांना उष्मघातसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. नाशिक शहरातील उन्हाची तीव्रता देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नाशिककरांची घराबाहेर पडण्यासाठी घालमेल होत आहे. तसेच वाहनचालकांसह नागरिकांना सिग्नलला थांबण्यासाठी दमछाक होत आहे. अशावेळी  नागरिकांना णारा त्रास पाहता शासकीय यंत्रणेनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक शहरात दुपारच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Nashik News)



सध्या नाशिक शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तर दुपारी एक ते चार या काळात उष्णतेची तीव्रता अधिक असल्यामुळे नागरिकांचा त्रासही वाढला आहे. या वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी नाशिक पोलिसांनी नवी उपाययोजना काढली आहे. शहरातील जवळपास ३० प्रमुख सिग्नल दुपारी १ ते ४ दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी काही ठिकाणी सिग्नल ब्लिंक मोडवर टाकण्यात येणार असून वाहनचालकांना स्वतः काळजी घेत वाहतूक सुरळीत करावी लागणार आहे. नागरिकांना भर उन्हात सिग्नलवर ताटकळत उभे रहावे लागते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांच्या या निर्णयामुळे ट्रॅफिक विस्कळीत होण्याची शक्यात आहे, मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी हा उपाय अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. (Nashik News)



नाशिककरांना काळजी घेण्याचे आवाहन


नाशिकमध्ये वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा. तसेच भरपूर पाणी प्यावे, टोपी/गॉगल्स/स्कार्फ यांचा वापर करावा असे घराबाहेर पडताना योग्य काळजी घेऊनच घराबाहेर पडा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Astrology: ज्या लोकांच्या नशीबात असतो खूप पैसा, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: हस्तरेषा शास्त्र हे व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य आणि नशीबाबाबत सांगितले जाते. दरम्यान,

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ठाणे : ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी ठाण्यातील राहत्या

घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल

मेट्रो प्रकल्पाच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

आणखी एका गर्दीने घेतले नाहक जीव! मरण खरंच स्वस्त झालंय का?

मुंबई : आपल्या देशात कोणत्याही सण, उत्सव, सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी आणि त्यात जाणारे बळी हे नेहमीचंच झालंय.

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.