Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक! 

नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय!


नाशिक : एप्रिल महिन्याला सुरुवात होताच तापमानाचा (Nashik Temperature) पारा चांगलाच वाढला आहे. राज्यभरात वाडत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून अनेकांना उष्मघातसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. नाशिक शहरातील उन्हाची तीव्रता देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नाशिककरांची घराबाहेर पडण्यासाठी घालमेल होत आहे. तसेच वाहनचालकांसह नागरिकांना सिग्नलला थांबण्यासाठी दमछाक होत आहे. अशावेळी  नागरिकांना णारा त्रास पाहता शासकीय यंत्रणेनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक शहरात दुपारच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Nashik News)



सध्या नाशिक शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तर दुपारी एक ते चार या काळात उष्णतेची तीव्रता अधिक असल्यामुळे नागरिकांचा त्रासही वाढला आहे. या वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी नाशिक पोलिसांनी नवी उपाययोजना काढली आहे. शहरातील जवळपास ३० प्रमुख सिग्नल दुपारी १ ते ४ दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी काही ठिकाणी सिग्नल ब्लिंक मोडवर टाकण्यात येणार असून वाहनचालकांना स्वतः काळजी घेत वाहतूक सुरळीत करावी लागणार आहे. नागरिकांना भर उन्हात सिग्नलवर ताटकळत उभे रहावे लागते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांच्या या निर्णयामुळे ट्रॅफिक विस्कळीत होण्याची शक्यात आहे, मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी हा उपाय अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. (Nashik News)



नाशिककरांना काळजी घेण्याचे आवाहन


नाशिकमध्ये वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा. तसेच भरपूर पाणी प्यावे, टोपी/गॉगल्स/स्कार्फ यांचा वापर करावा असे घराबाहेर पडताना योग्य काळजी घेऊनच घराबाहेर पडा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम

एलन मस्क यांचे सॅटेलाईट इंटरनेट भारतात लाँच

भारतात स्टारलिंगचे प्लॅन्स हे ८ हजार ६०० रुपयांपासून सुरू वॉशिंग्टन : प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांची

उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन वनराई बंधारे करणार

पंचायत समिती २१ बंधारे, कृषी कार्यालय बांधणार ५० शैलेश पालकर पोलादपूर : उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत

सतत स्क्रीनचा वापर करून डोळे थकले असतील तर न चुकता खा हे आठ पदार्थ, चष्म्याचा नंबरही होईल आपोआप कमी

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर तासन्‌तास काम करणे महत्वाचे झाले आहे. याचा

बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक

पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त