Vasai Crime : अपघात नव्हे घातपात! किरकोळ वादाच्या रागात भावानेच केला बहिणीचा खून

मुंबई : दोन दिवसांपूर्वी वसईतील (Vasai Crime) एका सात वर्षीय चिमुकल्या मुलीच्या मृत्यूची घटना घडली होती. सात वर्षीय अंजली मिथुन शर्मा या चिमुरडीचा मृत्यू स्टुलवरून घसरून ती खाली पडल्यामुळे झाला असल्याचे समोर आले होते. मात्र आता ही घटना आता चक्रावून टाकणाऱ्या वळणावर आली आहे. चिमुकलीचा हा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचे (Murder Case) उघड झाले आहे. सात वर्षीय अंजली मिथुन शर्माची हत्या तिच्या १२ वर्षीय भावानेच केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)



या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारावर मृत मुलीच्या भावाची चौकशी केली असता आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. किरकोळ वादातून चिडून त्याने बहिणीला पक्कडने मारल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी १८ वर्षाखालील आरोपी असल्यामुळे त्याच्यावर बालन्याय प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पेल्हार पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा विभाग यांच्यातर्फे या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.



नेमके प्रकरण काय?


गुरुवारी १७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले. वसई पूर्व येथील पेल्हार परिसरात राहणाऱ्या शर्मा कुटुंबात ही घटना घडली. सात वर्षीय अंजली मिथुन शर्मा ही तिच्या आई-वडील आणि भावासह राहत होती. नेहमीप्रमाणे गुरुवारी तिचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर तिचा भाऊ बाहेर खेळत होता असे सुरुवातीच्या तपासात सांगण्यात आले होते. यावेळी अंजलीने किचनमधील ओट्यावर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टुलवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टुलवरून घसरून ती खाली पडली आणि मानेजवळील भाग किचनच्या पक्कडवर आपटल्याने गंभीर जखमी झाली असल्याचे सांगितले. (Vasai Crime)


याप्रकारानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ अंजलीला वसई-विरार महानगरपालिकेच्या तुळिंज रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी अदखलपात्र मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता. परंतु या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोर येताच अंजलीचा अपघात नाही तर हत्या झाल्याचे समोर आले. याप्रकरणी अंजलीच्या भावाची चौकशी केली असता त्याने अंजलीसोबत झालेल्या एका किरकोळ वादाच्या रागात तिच्या डोक्यात थेट पक्कड घातली आणि तिचा खून झाला, असे समोर आले.

Comments
Add Comment

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजपचे चिपळूणमधील उमेदवार जाहीर

जि.प.साठी तीन, तर पं.स. साठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात भाजपचे नेते माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे नेते प्रशांत

जाणून घ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर, शिवाय तिकीट रद्द केल्यास मिळेल इतका रिफंड.. जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई: रात्रीच्या प्रवासासाठी खास तयार करण्यात आलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन आता सेवेत दाखल झाली असून

जिथे धुरंधर १  थांबला, तिथून धुरंधर २  बोलेल: रणवीर सिंगचे दमदार संवाद

धुरंधर १  ची वारसा, धुरंधर २  चे वादळ: रणवीर सिंगच्या लक्षात राहणाऱ्या संवादांची झलक काही कलाकार असे असतात जे

नणंद भावजयीचा वाद ; मालमत्ता वादात प्रिया कपूरचा मोठा निर्णय

Sunjay Kapur Property Case: कपूर कुटुंबियातील मालमत्ता आणि वारसाहक्काचा वाद गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत राहिला

शेफालीच्या मृत्यूमागे'काळी जादू' केल्याचा आरोप; अभिनेता पराग त्यागीचा खळबळजनक दावा

अभिनेता पराग त्यागीने पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये शेफाली जरीवालाच्या मृत्यूवर खळबळजनक वक्तव्य केले आहे.जून

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आज आणि उद्या वाहतूक निर्बंध

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा