Vasai Crime : अपघात नव्हे घातपात! किरकोळ वादाच्या रागात भावानेच केला बहिणीचा खून

मुंबई : दोन दिवसांपूर्वी वसईतील (Vasai Crime) एका सात वर्षीय चिमुकल्या मुलीच्या मृत्यूची घटना घडली होती. सात वर्षीय अंजली मिथुन शर्मा या चिमुरडीचा मृत्यू स्टुलवरून घसरून ती खाली पडल्यामुळे झाला असल्याचे समोर आले होते. मात्र आता ही घटना आता चक्रावून टाकणाऱ्या वळणावर आली आहे. चिमुकलीचा हा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचे (Murder Case) उघड झाले आहे. सात वर्षीय अंजली मिथुन शर्माची हत्या तिच्या १२ वर्षीय भावानेच केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)



या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारावर मृत मुलीच्या भावाची चौकशी केली असता आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. किरकोळ वादातून चिडून त्याने बहिणीला पक्कडने मारल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी १८ वर्षाखालील आरोपी असल्यामुळे त्याच्यावर बालन्याय प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पेल्हार पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा विभाग यांच्यातर्फे या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.



नेमके प्रकरण काय?


गुरुवारी १७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले. वसई पूर्व येथील पेल्हार परिसरात राहणाऱ्या शर्मा कुटुंबात ही घटना घडली. सात वर्षीय अंजली मिथुन शर्मा ही तिच्या आई-वडील आणि भावासह राहत होती. नेहमीप्रमाणे गुरुवारी तिचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर तिचा भाऊ बाहेर खेळत होता असे सुरुवातीच्या तपासात सांगण्यात आले होते. यावेळी अंजलीने किचनमधील ओट्यावर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टुलवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टुलवरून घसरून ती खाली पडली आणि मानेजवळील भाग किचनच्या पक्कडवर आपटल्याने गंभीर जखमी झाली असल्याचे सांगितले. (Vasai Crime)


याप्रकारानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ अंजलीला वसई-विरार महानगरपालिकेच्या तुळिंज रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी अदखलपात्र मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता. परंतु या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोर येताच अंजलीचा अपघात नाही तर हत्या झाल्याचे समोर आले. याप्रकरणी अंजलीच्या भावाची चौकशी केली असता त्याने अंजलीसोबत झालेल्या एका किरकोळ वादाच्या रागात तिच्या डोक्यात थेट पक्कड घातली आणि तिचा खून झाला, असे समोर आले.

Comments
Add Comment

लवकरच केदार शिंदेंचा 'हा' स्त्रीप्रधान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मराठी सिनेविश्वात स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळीच ओळख मिळवून देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा

नवऱ्याचं कौतुकचं नाही, अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मिडियावर ट्रोल

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर 2 सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत

हॉकी इंडियाची ८ व्या वार्षिक पुरस्कार २०२५ साठी नामांकने जाहीर

नवी दिल्ली : हॉकी इंडियाने ८ व्या वार्षिक पुरस्कार २०२५ साठी नामांकनांची यादी जाहीर केली. २७ मार्च २०२६ रोजी नवी

पुणे - मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला स्थलांतरित होणार

पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवर भाजपचा दबदबा - विरोधी पक्षनेत्याशिवायच कारभार सुरू

सोलापूर : सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या असून, आठ जागा मिळविलेला एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर

अभिनेत्री अनुष्का शर्मा ८ वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार ?

अभिनेत्री अनुष्का शर्मानं बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच, बॉलिवूडच्या तिन्ही