शिक्षकांसाठी ड्रेसकोड? प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर!

मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला या धोरणाचा आराखडा स्वतः तयार करण्याचं स्वातंत्र्य असणार असून, शिक्षकांनी शाळेत काय परिधान करावं, याबाबतचे व्यापक नियम ठरवले जाणार आहेत.


नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पिशव्या व शैक्षणिक बाकांचे वाटप करताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली. त्यांच्या आधीचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याची संकल्पना मांडली होती, मात्र त्याला तीव्र विरोध झाला होता.



दादा भुसे यांनी स्पष्ट केलं की, हा केवळ प्रस्ताव आहे आणि त्यावर सविस्तर आराखडा तयार करण्यात येईल. मात्र, धोरण व्यापक असलं तरी त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर म्हणजेच जिल्हा व शाळा स्तरावर केली जाईल. प्रत्येक जिल्हा प्रशासन व शासकीय शाळांना त्यासाठी अंतर्गत नियमावली ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत येताच, राज्यातील शिक्षक संघटनांमध्ये यावर चर्चा सुरू झाली आहे. आता पाहावं लागेल की शिक्षक ड्रेसकोडचा विषय यावेळी कितपत पुढे जातो आणि तो अमलात येतो की नाही.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .