Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवर १५ मेपर्यंत निर्बंध!

मुंबई  : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची भर पडली आहे. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली असून गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नये, स्थानकात गर्दी कमी व्हावी यादृष्टीने मध्य रेल्वेने फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध घातले आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, पुणे येथे फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.



मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त सुमारे १,२०४ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या घोषित केल्या आहेत. यामध्ये २९० अनारक्षित रेल्वेगाड्या व ४२ वातानुकूलित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणीनुसार विविध मार्गांवर अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील विविध भागांत विशेष रेल्वेगाड्या चालविल्या आहेत. त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रमुख टर्मिनसवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे.

Comments
Add Comment

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे 'ईटीएस' सर्वेक्षण

राज्यातील अवैध उत्खननावर 'एसआयटी'चा हातोडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा मुंबई :

खासगी कंपन्यांमधील कामाचे तास वाढवणारे विधेयक राज्य सरकारकडून मागे

मुंबई : राज्यातील दुकाने आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास १० पर्यंत वाढवण्याबाबतचे