Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवर १५ मेपर्यंत निर्बंध!

मुंबई  : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची भर पडली आहे. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली असून गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नये, स्थानकात गर्दी कमी व्हावी यादृष्टीने मध्य रेल्वेने फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध घातले आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, पुणे येथे फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.



मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त सुमारे १,२०४ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या घोषित केल्या आहेत. यामध्ये २९० अनारक्षित रेल्वेगाड्या व ४२ वातानुकूलित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणीनुसार विविध मार्गांवर अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील विविध भागांत विशेष रेल्वेगाड्या चालविल्या आहेत. त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रमुख टर्मिनसवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,