RBI Action : ३ बड्या बँकांवर आरबीआयची धडक कारवाई! ग्राहकांवर होणार परिणाम?

  138

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) राज्यातील नियमांचे उल्लंघन करणारे किंबा आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बँकांवर कारवाई करते. मागील महिन्यात आरबीआयने एचडीएफसीसह बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर कारवाई केली होती. त्यानंतर आता आणखी ३ मोठ्या बँकांवर आरबीआयने धडक कारवाई केली (RBI Action) आहे. मात्र यामुळे खातेधारकांच्या ठेवींवर काही परिणाम तर होणार नाही? असा प्रश्न सामान्य खातेधारकांना पडत आहे.



आरबीआयने कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या बँकांवर कारवाई केली आहे. दरम्यान, आरबीआयने तिन्ही बँकांवर ही कारवाई करत असतानाच त्याची सर्वतोपरि जबाबदारी बँकांची असून बँकांच्या खातेधारकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही असे म्हटले आहे.


आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, कोटक महिंद्रा बँकेकडून (Kotak Mahindra Bank) 'कर्ज वितरणासाठी कर्ज प्रणाली'चे निर्देश तसंच 'कर्ज आणि आगाऊ वैधानिक', इतर निर्बंधांसंदर्भातील सूचनांचं पालन न केल्यामुळं बँकेला ६१.४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, 'बँकांमधील ग्राहक सेवा' संदर्भात आरबीआयनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्याने पंजाब नॅशनल बँकेवर (PNB) २९.६ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.



तसेच केवायसी (Know Your Customer - KYC) संदर्भातील काही सूचनांचं पालन न केल्याप्रकरणी आयडीएफसी फर्स्ट बँकेला (IDFC First Bank) आरबीआयनं ३८.६ लाखांचा दंड ठोठावला आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्याची बाब लक्षात येताच आरबीआय बँकांवर कारवाईचा बडगा उगारते. मात्र यावेळी खातेधारकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षतासुद्धा बँकेकडून घेण्यात येते.
Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने