RBI Action : ३ बड्या बँकांवर आरबीआयची धडक कारवाई! ग्राहकांवर होणार परिणाम?

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) राज्यातील नियमांचे उल्लंघन करणारे किंबा आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बँकांवर कारवाई करते. मागील महिन्यात आरबीआयने एचडीएफसीसह बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर कारवाई केली होती. त्यानंतर आता आणखी ३ मोठ्या बँकांवर आरबीआयने धडक कारवाई केली (RBI Action) आहे. मात्र यामुळे खातेधारकांच्या ठेवींवर काही परिणाम तर होणार नाही? असा प्रश्न सामान्य खातेधारकांना पडत आहे.



आरबीआयने कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या बँकांवर कारवाई केली आहे. दरम्यान, आरबीआयने तिन्ही बँकांवर ही कारवाई करत असतानाच त्याची सर्वतोपरि जबाबदारी बँकांची असून बँकांच्या खातेधारकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही असे म्हटले आहे.


आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, कोटक महिंद्रा बँकेकडून (Kotak Mahindra Bank) 'कर्ज वितरणासाठी कर्ज प्रणाली'चे निर्देश तसंच 'कर्ज आणि आगाऊ वैधानिक', इतर निर्बंधांसंदर्भातील सूचनांचं पालन न केल्यामुळं बँकेला ६१.४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, 'बँकांमधील ग्राहक सेवा' संदर्भात आरबीआयनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्याने पंजाब नॅशनल बँकेवर (PNB) २९.६ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.



तसेच केवायसी (Know Your Customer - KYC) संदर्भातील काही सूचनांचं पालन न केल्याप्रकरणी आयडीएफसी फर्स्ट बँकेला (IDFC First Bank) आरबीआयनं ३८.६ लाखांचा दंड ठोठावला आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्याची बाब लक्षात येताच आरबीआय बँकांवर कारवाईचा बडगा उगारते. मात्र यावेळी खातेधारकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षतासुद्धा बँकेकडून घेण्यात येते.
Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या