Amravati Water Supply : अमरावती, बडनेरा शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद!

अमरावती : राज्यभरात उन्हाचा कडाका (Summer Heat) वाढत चालला असून उन्हाच्या वाढत्या झळांसह नागरिकांना पाण्याची गरज भासत आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात अमरावतीकरांवर पाणीसंकटाचा (Water Shortage) सामना करावा लागत आहे. अमरावती व बडनेरा शहरात पाणीगळतीची समस्या सुरु असल्यामुळे येथील पाणीपुरवठा दोन दिवस बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Amravati Water Supply)



मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती व बडनेरा शहरात पाईपलाईनमधून होत असलेल्या पाणी गळतीचा दोष दुरूस्तीच्या अनुषंगाने शहराचा पाणीपुरवठा २३ व २४ एप्रिलला पूर्णतः बंद राहणार आहे.अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या निरपिंगळाई बीपीटीपासून येणारी २५ मीमी व्यासाच्या पीएससी गुरूत्ववाहिनीमधून नांदगाव ते माहुली गावाच्या मध्ये पाणीगळती होत आहे. हा दोष दुरूस्त करण्याकरिता २२ ते २३ एप्रिल रोजी अमरावती व बडनेरा हरातचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Amravati Water Supply)


पाणीगळती दोष त्वरित दुरूस्त करण्यात येऊन पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. तरीपण नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून साठवून ठेवावे, असे आवाहन मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Political News : संसदेचे अधिवेशन सुरू असताना पुण्यात येणार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, जाणून घ्या कारण

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुण्याचा दौरा करणार आहेत. दोन

Devendra Fadnavis : मराठी भाषा आणि बोलींच्या संवर्धनाला मिळणार गती

कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; गडचिरोलीत नाट्य संकुल उभारणार मुंबई : मराठी भाषा, साहित्य

Ashadhi Wari Ringan 2026 : आषाढी वारीचा उत्साह शिगेला! उद्या खुडूस फाट्यावर रंगणार माऊलींचे दुसरे गोल रिंगण

सोलापूर : आषाढी वारीतील सर्वाधिक आकर्षण असलेल्या सोहळ्यांपैकी एक असलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली

Shirdi Woman Attack : धारदार शस्त्र घेऊन आले आणि सपासप वार केला; शिर्डी साई मंदिराबाहेर महिलेवर हल्ला

शिर्डी साई मंदिराबाहेर महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ मुंबई: साईबाबांच्या शिर्डी मंदिर (Shirdi Temple)

Mumbai Rain Alert : मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पुढील ३ तास मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert)

Wardha Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारला आग लागून पाच जणांचा मृत्यू, एक गंभीर

वर्धा : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) रविवारी उशिरा रात्री भीषण अपघात (Accident) घडला. या दुर्घटनेत