TATA Hospital : टाटा रुग्णालयातील डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी!

अवघ्या ४ वर्षांच्या मुलीला मरणाच्या दारातून परत आणले


मुंबई : टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ४ वर्षाच्या चिमुकलीला मरणाच्या दारातून परत आणले आहे. हृदयात छिद्र असलेल्या चार वर्षाच्या मुलीला टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले आहे. अवघ्या लहान वयात जडलेल्या आजारातून चिमुकलीला बाहेर काढल्यामुळे टाटा रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले जात आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली येथे राहणाऱ्या मौर्य कुटुंबात २०२१ मध्ये कन्येचं आगमन झालं. परंतु जन्मानंतर अवघ्या १० दिवसांतच तिचा श्वासोच्छवास जलद गतीने होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला त्वरित जवळच्या डॉक्टरांकडे नेले. २ डी इको चाचणीने चिमुकलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला उपचारांसाठी वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या हृदयात आकाराने मोठे, तसेच त्याच्यापर्यंत पोहोचण्यास अवघड असे एक छिद्र आढळले. तिच्या वयोमानासुार या टप्प्यावर खुली शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. त्यामुळे डॉक्टरांनी ती साडेतीन महिन्यांची झाल्यावर तिच्यावर तात्पुरती पीए बँडिंग शस्त्रक्रिया करून हृदयावरील ताण कमी केला. तिच्या हृदयातील छिद्रामुळे तिचे दैनंदिन जगणे अवघड झाले होते. ती फारशी हालचाल न करताही थकायची, तिच्या वयाच्या अन्य मुलांप्रमाणे ती खेळू किंवा धावू शकत नव्हती. तिचा बहुतेक वेळ घरातच जात असे. अन्य मुलांप्रमाणे तिला हसता, खेळता आणि स्वच्छंदपणे जगता येत नसल्याचे मौर्य कुटुंब चिंताग्रस्त होते.


हृदयाला असलेल्या छिद्रामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, वाढ खुंटणे या समस्यांचा चिमुकलीला सामना करावा लागला होता. तिच्या हृदयातील छिद्र बुजविणे आवश्यक होते. पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाला ५ ते ७ दिवस आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवावे लागते. वाडिया रुग्णालयातील बालरोग हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. क्षितिज सेठ आणि डॉ. जैन यांच्या नेतृत्वाखाली कॅथ लॅबमधील डॉक्टरांच्या पथकाने हायब्रिड तंत्राचा वापर करून तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान या कामगिरीनंतर टाटा रुग्णालयातील डॉक्टरांचे जगभरातून कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पुलाचे काम सुरू

मुंबई : १२५ वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही