TATA Hospital : टाटा रुग्णालयातील डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी!

  35

अवघ्या ४ वर्षांच्या मुलीला मरणाच्या दारातून परत आणले


मुंबई : टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ४ वर्षाच्या चिमुकलीला मरणाच्या दारातून परत आणले आहे. हृदयात छिद्र असलेल्या चार वर्षाच्या मुलीला टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले आहे. अवघ्या लहान वयात जडलेल्या आजारातून चिमुकलीला बाहेर काढल्यामुळे टाटा रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले जात आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली येथे राहणाऱ्या मौर्य कुटुंबात २०२१ मध्ये कन्येचं आगमन झालं. परंतु जन्मानंतर अवघ्या १० दिवसांतच तिचा श्वासोच्छवास जलद गतीने होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला त्वरित जवळच्या डॉक्टरांकडे नेले. २ डी इको चाचणीने चिमुकलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला उपचारांसाठी वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या हृदयात आकाराने मोठे, तसेच त्याच्यापर्यंत पोहोचण्यास अवघड असे एक छिद्र आढळले. तिच्या वयोमानासुार या टप्प्यावर खुली शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. त्यामुळे डॉक्टरांनी ती साडेतीन महिन्यांची झाल्यावर तिच्यावर तात्पुरती पीए बँडिंग शस्त्रक्रिया करून हृदयावरील ताण कमी केला. तिच्या हृदयातील छिद्रामुळे तिचे दैनंदिन जगणे अवघड झाले होते. ती फारशी हालचाल न करताही थकायची, तिच्या वयाच्या अन्य मुलांप्रमाणे ती खेळू किंवा धावू शकत नव्हती. तिचा बहुतेक वेळ घरातच जात असे. अन्य मुलांप्रमाणे तिला हसता, खेळता आणि स्वच्छंदपणे जगता येत नसल्याचे मौर्य कुटुंब चिंताग्रस्त होते.


हृदयाला असलेल्या छिद्रामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, वाढ खुंटणे या समस्यांचा चिमुकलीला सामना करावा लागला होता. तिच्या हृदयातील छिद्र बुजविणे आवश्यक होते. पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाला ५ ते ७ दिवस आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवावे लागते. वाडिया रुग्णालयातील बालरोग हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. क्षितिज सेठ आणि डॉ. जैन यांच्या नेतृत्वाखाली कॅथ लॅबमधील डॉक्टरांच्या पथकाने हायब्रिड तंत्राचा वापर करून तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान या कामगिरीनंतर टाटा रुग्णालयातील डॉक्टरांचे जगभरातून कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.