Breaking News : धक्कादायक! पाच वर्षाच्या चिमुकलींवर स्कुल बसमध्ये लैंगिक अत्याचार

  97

कर्जत : बदलापूरमध्ये झालेल्या दोन चिमुकल्यांवरच्या अत्याचाराची पुनरावृत्ती रायगडमध्ये घडली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीत एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या दोन निरागस मुलींवर स्कूलबस मधील क्लीनरने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण रायगड हादरले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, कर्जतमधील वदप येथील शाळेतील स्कूलबसमध्ये क्लीनरने पाच वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केले. करण दीपक पाटील असे या नराधमाचे नाव आहे .स्कूल बस मध्येच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलींच्या मेडिकल तपासात उघडकीस आले असून याप्रकरणी बस क्लीनरला कर्जत पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे .याप्रकरणी आरोपीवर कर्जत पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे .ही घटना बदलापूर घटनेची पुनरावृत्ती असून आपल्या मुलींना शाळेत पाठवायचे की नाही? असा सवाल पालकांकडून केला जात आहे .

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री

'हाउसफुल ५' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचा चित्रपट 'हाउसफुल ५' ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -