Maharashtra Weather : राज्यभरात वाढणार तीव्र उष्णतेची लाट! पहा पुढील ४-५ दिवस कसे असेल हवामान?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता हे तापमान आणखी वाढणार (Heat Wave) असल्याचा हवामान विभागाने (Meteorological Department) इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडा असे आवाहन केले आहे.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागात पावसाचे वातावरण असले तरी बहुतांश भागात उष्ण आणि दमट हवामान आहे. दरम्यान, पुढील ४ ते ५ दिवस राज्यातील हवामान असेच राहणार आहे. गुजरातसह पश्चिम राजस्थानमधील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर गुजरातचा काही भाग, केरळ आणि माहे तसेच महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात २० एप्रिलपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.



काही भागात पावसाची शक्यता 


पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील ५ दिवसांत वीज आणि जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ आणि छत्तीसगडच्या मैदानांवर उद्या विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर १८ एप्रिल म्हणजेच उद्या बिहार, आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस, तर पश्चिम बंगाल व बिहारमध्ये १७ व १८ एप्रिलला वादळासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. (Rain Alert)


दक्षिण भारतातील तामिळनाडू, पुडुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये पुढील ५ दिवस विजांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. केरळ व माहे येथे १७ ते १९ एप्रिलदरम्यान जोरदार वारे व विजांचा संभव असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

‘द केरल स्टोरी २ ’च्या आगमनापूर्वी दिल्लीतील भावनिक पत्रकार परिषद; पीडितांनी सांगितल्या आपल्या खऱ्या कहाण्या

मुंबई : ‘द केरल स्टोरी २  – गोज बियॉन्ड’च्या रिलीजपूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार

‘द पॅराडाइज’च्या निर्मात्यांकडून ‘आया शेर’चा प्रोमो प्रदर्शित

हैद्राबाद : यावर्षीच्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘द पॅराडाइज’च्या निर्मात्यांनी

Sri Lankan Navy : श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मासेमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने पंबनमध्ये १२ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे, ज्यामुळे या भागातील मच्छिमारांमध्ये

South China Sea earthquake: ७.१ तीव्रतेच्या भूकंपाने दक्षिण चीन समुद्र हादरला

दिल्ली: रविवारी दक्षिण चीन समुद्र ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS)

Nepal Accident: नेपाळमध्ये त्रिशुली नदीत बस कोसळून १८ जणांचा मृत्यू

काठमांडू: नेपाळच्या राजधानीपासून सुमारे ९० किमी अंतरावर एक मोठा बस अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी नेपाळच्या

Maharashtra Unseasonal Rain: महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

मुंबई: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर, गोंदिया