Maharashtra Weather : राज्यभरात वाढणार तीव्र उष्णतेची लाट! पहा पुढील ४-५ दिवस कसे असेल हवामान?

  123

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता हे तापमान आणखी वाढणार (Heat Wave) असल्याचा हवामान विभागाने (Meteorological Department) इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडा असे आवाहन केले आहे.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागात पावसाचे वातावरण असले तरी बहुतांश भागात उष्ण आणि दमट हवामान आहे. दरम्यान, पुढील ४ ते ५ दिवस राज्यातील हवामान असेच राहणार आहे. गुजरातसह पश्चिम राजस्थानमधील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर गुजरातचा काही भाग, केरळ आणि माहे तसेच महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात २० एप्रिलपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.



काही भागात पावसाची शक्यता 


पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील ५ दिवसांत वीज आणि जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ आणि छत्तीसगडच्या मैदानांवर उद्या विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर १८ एप्रिल म्हणजेच उद्या बिहार, आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस, तर पश्चिम बंगाल व बिहारमध्ये १७ व १८ एप्रिलला वादळासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. (Rain Alert)


दक्षिण भारतातील तामिळनाडू, पुडुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये पुढील ५ दिवस विजांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. केरळ व माहे येथे १७ ते १९ एप्रिलदरम्यान जोरदार वारे व विजांचा संभव असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :