Mumbai : मुंबईत कार अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई : ईस्टर्न फ्रीवेवर शिवडीजवळ मारुती इको कारने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात रामजी जयस्वार (६०) आणि विनोद रामा वैद्य (५२) यांचा मृत्यू झाला. अपघातात गीता राजभर, खुशबू राजभर, सुलेखा वैद्य आणि चेतन नंदू पाटील हे चौघे जखमी झाले.



मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात राहणारे दक्षिण मुंबईत मासे खरेदीसाठी जात होते. ही मंडळी मुंबईत मासे खरेदी करुन त्यांची ठाण्यात विक्री करत होते. व्यवसायाकरिता ते नियमित ठाणे ते दक्षिण मुंबई असा प्रवास करत होते. नेहमीप्रमाणे या वेळीही सर्व जण मासे खरेदीसाठी कारने निघाले होते. कार चेतन नंदू पाटील चालवत होता. त्याने रस्ता मोकळा बघून कारचा वेग वाढवला. वेग खूपच जास्त वाटल्यामुळे कारमध्ये बसलेल्या सर्वांनीच चेतनला जरा हळू चालव असे सांगून बघितले. पण चेतनने कारचा वेग कमी केला नाही. भरधाव वेगाने जात असताना नियंत्रण सुटले आणि ईस्टर्न फ्रीवेवर शिवडीजवळ मारुती इको कार दुभाजकाला धडकली. कार जोरात धडकल्यामुळे झालेल्या अपघातात रामजी जयस्वार (६०) आणि विनोद रामा वैद्य (५२) गंभीर जखमी झाले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
Comments
Add Comment

Monsoon Update : देशात पावसाची 64 टक्के तूट; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

मुंबई : भारतात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. सोमवार, 15 जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या

Census : राज्यातील जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबई : जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या

Pre-Monsoon Preparations : ठाणे जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश

सर्व मनपानी आपापल्या क्षेत्रातील क्लस्टर पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे एमएसईबीची प्रलंबित कामे तत्काळ

Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा

मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai Metropolitan Region : आता एकाच तिकिटावर करा संपूर्ण 'एमएमआर'मध्ये बस प्रवास!

राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम मुंबई : मुंबई

Smart Meter : स्मार्ट मीटरवर मोठा निर्णय येणार? जयंत पाटील-फडणवीस भेट चर्चेत

मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि