रायगड जिल्हा शतप्रतिशत भाजपा होणार; रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई : आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडितशेठ तथा सुभाष पाटील यांनी बुधवारी जि.प. माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी खा. धैर्यशील पाटील, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, अविनाश कोळी, कमलाकर दळवी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.


यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश आणि राज्य विकासाच्या वाटेवर वेगाने जात आहे. या दोघांवर असलेल्या विश्वासामुळे श्री. पाटील यांनी शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. श्री. पंडितशेठ पाटील हे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात पक्षसंघटनेला अधिक ताकद मिळणार आहे. श्री. पाटील यांचा पक्षात यथोचित सन्मान राखला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याचा सर्वांगीण विकास होणार याची हमी असल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे श्री. सुभाष पाटील यांनी सांगितले. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपाच्या साथीने आगामी काळात जोमाने कार्य करून जिल्ह्यात भाजपाला क्रमांक एक चा पक्ष बनवू असा शब्द ही श्री. पाटील यांनी दिला.


माजी आमदार दिवंगत मीनाक्षी पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा बॅंकेचे संचालक आस्वाद पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे ६ माजी सभापती, ७ जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा बँकेचे दोन संचालक, आजी माजी ६० सरपंच यांसह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शेकापमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये जनार्दन पाटील, सुगंधा पाटील, संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, भावना पाटील, संदीप घरत, एकनाथ गायकवाड, वैभव चांदे, वसंत यादव, राजा सानप, स्मिता पाटील, महादेव दिवेकर आदींचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास