Raigad : शेकापच्या जयंत पाटील यांच्या घरात फूट

मुंबई : रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार पंडीत पाटील यांनी बुधवारी मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी आस्वाद पाटील यांच्यासह शेकापच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. शेकापचे नेते जयंत पाटील यांचे पंडीत पाटील हे भाऊ आहेत, तर आस्वाद पाटील हे जयंत पाटील यांच्या भगिनी माजी आमदार मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आहेत. पंडीत पाटील आणि आस्वाद पाटील यांनी शेकापला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या घरातच राजकीय फूट पडली आहे.



रविंद्र चव्हाण यांनी पंडीत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपात स्वागत केले. शेकापच्या जुन्या आणि नव्या पिढीने एकत्रितपणे भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे रायगड जिल्हा शत प्रतिशत भाजपा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचा उत्तम जनसंपर्क आहे आणि ते तळागाळातल्या लोकांसाठी काम करतात. या सर्व सदस्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्यांचा भाजपाला लाभ होईल; असेही भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार धैर्यशील पाटील उपस्थित होते.





रायगड जिल्ह्याच्या विकासाकरिता भाजपात राहून काम करणार असल्याचे पंडीत पाटील म्हणाले. रायगड जिल्ह्यातील अपुरे प्रकल्प पूर्णत्वास नेऊ, वडखल ते थळ प्रवासी रेल्वे व्हावी यासाठी पाठपुरावा करू; असेही पंडीत पाटील म्हणाले. मविआत असताना अनंत गीतेंचा प्रचार केला. पण निवडणुकीत हरल्यावर गीतेंनी माझा फोन घेणेच टाळले. महायुतीच्या विरोधात प्रचार केला तरी रायगड जिल्ह्यातील त्यांचे नेते विकासाच्या प्रश्नांसाठी मनमोकळा संवाद साधतात. खासदार तटकरे पण कधीही कॉल उचलतात; असे पंडीत पाटील म्हणाले.

अनेक नद्या उपनद्या पुढे गंगेला जाऊन मिळतात. गंगा ही मोठी नदी आहे. हाच विचार करुन रायगड जिल्ह्याच्या विकासाचे काम करण्याकरिता भाजपात प्रवेश केल्याचे पंडीत पाटील यांनी सांगितले. एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सुनील तटकरेंना जे मदत करतात, त्यांना तटकरे मदत करत नाहीत, हा त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे; असे सांगितले. शेकापने विविध पक्षांसोबत आघाडी केली. मात्र त्याचा लाभ आघाडी केलेल्यांना झाला, शेकापला झाला नाही. असेही पंडीत पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देतेवेळी सांगितले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याचे उत्तर महाराष्ट्र दिनापर्यंत अर्थात १ मे पर्यंत तरी मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजनाची बैठक अर्थमंत्र्याकडे झाली, हे लोकशाहीला घातक असल्याची टीकाही पंडीत पाटील यांनी केली.
Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०