Nitin Gadkari : आता टोलनाके राहणार नाहीत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

  159

१५ दिवसात येणार नवी पॉलिसी


मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील दादर येथे डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करुन अमर हिंद मंडळाच्या ७८व्या व्याख्यानमालेत उपस्थितीत दर्शवत मार्गदर्शन केले. बाबासाहेबांचे जीवन सामाजिक आर्थिक समतेसाठी महत्त्वाचे आहे. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी लोकप्रबोधन महत्त्वाचे आहे, विचारमंथन आवश्यक आहे. पण, आपल्या देशात विचार भिन्नतेपेक्षा विचारशून्यता असल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली. येथील वाख्यानमालेत बोलताना त्यांनी देशभरातील रस्ते, पूल, टोलनाके आणि भावी प्रकल्पांबाबत माहिती दिली. तर, टोलबाबत मी जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला लवकरच १५ दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल, की टोलबाबत तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही, अशी केंद्रीय मंत्री गडकरींनी घोषणाच केली.


टोलबाबत मी जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला लवकरच १५ दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल, की टोलबाबत तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही. पण मी महाराष्ट्राच्या टोलबाबत बोलत नाही, NHI राष्ट्रीय महामार्गाबाबत बोलतोय, असे नितीन गडकरी यांनी म्हंटल. आता टोलनाके राहणार नाहीत, पण सॅटेलाईट सिस्टीमद्वेरा तुम्ही तिथून निघाल्यानंतर तुमच्या नंबरप्लेटवरुन तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे कपात होतील, अशी माहिती देखील नितीन गडकरी यांनी दिली. तसेच, पुढच्या २ वर्षात इंडियन रोड इनफ्रा अमेरिकेपेक्षा चांगले राहील असेही ते म्हणाले. तसेच, मुंबई-गोवा महामार्ग जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.



टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्याकरता सरकार पातळीवर अनेक उपाययोजना आणल्या जात आहेत. त्याकरता फास्ट टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे. फास्टटॅगकरताही टोलनाक्यावर गाड्यांना बराच काळ रांगेत उभे रहावे लागते. यासाठी देशातील टोलनाकेच आता बंद व्हावेत, याकरता केंद्र सरकारने नवी यंत्रणा राबवण्याचा विचार केला आहे. असे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, “सॅटलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार करतोय. यामुळे टोलनाके राहणार नाहीत. तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे.” तसेच या नवीन धोरणात, सरकार लोकांना तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग रिचार्ज करण्याची सुविधा देणार आहे. त्यानंतर त्यांना पुढील एक वर्षासाठी कोणत्याही टोल प्लाझावर कर भरावा लागणार नाही असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल