‘लैंगिक हिंसाचार प्रकरणात न्यायाधीशांनी वादग्रस्त टिप्पणी टाळावी’

नवी दिल्ली : बलात्कार पीडितेबद्दलच्या टिप्पणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.१५) अलाहाबाद उच्च न्यायालयाला फटकारले. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वादग्रस्त टिप्पणी करु नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे .


१० एप्रिल रोजी एका प्रकरणात बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले होते की, 'पीडित मुलीने स्वतःच संकटाला आमंत्रण दिले आहे, ती बलात्कारासाठी जबाबदार आहे.’ या टिप्पणीवर न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने आक्षेप घेतला.


अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी ही टिप्पणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज म्हटले की, जामीन मंजूर करणे हा प्रत्येक प्रकरणातील तथ्यांवर अवलंबून न्यायाधीशांचा विवेक असला तरी तक्रारदाराविरुद्ध असे अनावश्यक निरीक्षण टाळले पाहिजे. अशा टिप्पण्या करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. पूर्ण न्याय झाला पाहिजे आणि तो दिसलाही पाहिजे. सामान्य माणूस अशा आदेशांना कसा पाहतो हे देखील पाहिले पाहिजे, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले. दरम्यान, २६ मार्च रोजीही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अशाच एका टिप्पणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते.

Comments
Add Comment

India - Pak Border : भारत-पाक सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला! BSFच्या गोळीबारात संशयित ठार; पंजाबमध्ये सुरक्षा वाढवली

पंजाब : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (BSF) उधळून लावला. पंजाबमधील

Varanasi Ganga Aarti : वाराणसीत गंगेचा रौद्ररूप! दशाश्वमेध घाटावरील प्रसिद्ध गंगा आरतीची जागाच बदलली

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये गंगा नदीच्या वाढत्या जलस्तराचा परिणाम आता धार्मिक कार्यक्रमांवरही होत

India-America Relation : भारत-अमेरिका संबंधांना नवी दिशा! अमेरिकेच्या उपाध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे

Uday Samant : मराठी चित्रपटांतून संस्कृतीला जागतिक व्यासपीठ, मराठी भाषा मंत्री उदय सामंत; दिल्लीतील महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली : मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण

Bastar : बस्तरच्या ९२ गावांत प्रथमच तिरंगा, नक्षली दहशतीच्या सावटातून राष्ट्रीय प्रवाहाकडे वाटचाल

रायपूर : नक्षलवादाच्या दहशतीमुळे गेली अनेक दशके स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापासून दूर राहिलेल्या

CJI Surya Kant : न्यायानेच नागरिकांपर्यंत पोहोचावे, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे आवाहन

नवी दिल्ली : न्याय मिळवण्यासाठी नागरिकांनी न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी