‘लैंगिक हिंसाचार प्रकरणात न्यायाधीशांनी वादग्रस्त टिप्पणी टाळावी’

नवी दिल्ली : बलात्कार पीडितेबद्दलच्या टिप्पणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.१५) अलाहाबाद उच्च न्यायालयाला फटकारले. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वादग्रस्त टिप्पणी करु नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे .


१० एप्रिल रोजी एका प्रकरणात बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले होते की, 'पीडित मुलीने स्वतःच संकटाला आमंत्रण दिले आहे, ती बलात्कारासाठी जबाबदार आहे.’ या टिप्पणीवर न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने आक्षेप घेतला.


अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी ही टिप्पणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज म्हटले की, जामीन मंजूर करणे हा प्रत्येक प्रकरणातील तथ्यांवर अवलंबून न्यायाधीशांचा विवेक असला तरी तक्रारदाराविरुद्ध असे अनावश्यक निरीक्षण टाळले पाहिजे. अशा टिप्पण्या करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. पूर्ण न्याय झाला पाहिजे आणि तो दिसलाही पाहिजे. सामान्य माणूस अशा आदेशांना कसा पाहतो हे देखील पाहिले पाहिजे, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले. दरम्यान, २६ मार्च रोजीही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अशाच एका टिप्पणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते.

Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत