Avaada Company : आवादा कंपनीत चोरी करणाऱ्या टोळीचा वाल्मिक कराडशी संबंध ?

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आवादा कंपनी चर्चेत होती. या आवादा कंपनीतुन पवनचक्की प्रकल्पाचे काम सुरु असलेल्या ठिकाणाहून काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याची माहिती मिळाली. या चोरी प्रकरणात 'आवादा' कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पावर सुरक्षारक्षकांना बांधून ठेवून तेथून तांबे चोरून नेणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र या चोरीमागे वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांचा हात असू शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी आवादा कंपनीतील पवनचक्की प्रकल्पावर सुरक्षारक्षकांना बांधून ठेवून तेथून चार चोरांनी तांबे चोरी केले. या प्रकरणानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. शेख यांच्या पथकानेे बबन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे आणि लालासाहेब सखाराम पवार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान या घटनेने वाल्मिक कराडचे सहकारी अजूनही कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Weather Alert: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: राज्यातील हवामानात बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर पोहोचताच हवामानात

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Pandharpur Crime News : पंढरपूर दुहेरी हत्याकांड : अवघ्या १० मिनिटांत मायलेकावर सपासप वार, तपास अधिकारी बदलले अन् असं उकललं पंढरपूरचं हत्याकांड

पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना