Avaada Company : आवादा कंपनीत चोरी करणाऱ्या टोळीचा वाल्मिक कराडशी संबंध ?

  43

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आवादा कंपनी चर्चेत होती. या आवादा कंपनीतुन पवनचक्की प्रकल्पाचे काम सुरु असलेल्या ठिकाणाहून काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याची माहिती मिळाली. या चोरी प्रकरणात 'आवादा' कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पावर सुरक्षारक्षकांना बांधून ठेवून तेथून तांबे चोरून नेणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र या चोरीमागे वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांचा हात असू शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी आवादा कंपनीतील पवनचक्की प्रकल्पावर सुरक्षारक्षकांना बांधून ठेवून तेथून चार चोरांनी तांबे चोरी केले. या प्रकरणानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. शेख यांच्या पथकानेे बबन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे आणि लालासाहेब सखाराम पवार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान या घटनेने वाल्मिक कराडचे सहकारी अजूनही कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत