Ahilyanagar News : अपघातात माणुसकी मेली!

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातानंतर मात्र गावकऱ्यांची चांदीच चांदी झाली. आज (दि १५) सकाळी आठच्या सुमारास अहिल्यानगरमध्ये पेट्रोलच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर झाला. मात्र जखमी झालेल्या चालकाचे प्राण वाचवायचे सोडून या अपघाताची बातमी गावभर समजल्यावर गावकऱ्यांनी पेट्रोल घेण्यासाठी गर्दी केली.



मिळलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या करंजी घाटात आज (दि १५) सकाळी २० हजार लिटर क्षमतेचा पेट्रोलचा टँकर उलटून अपघात झाला. मुंबईवरून परभणीच्या दिशेने हा टँकर निघाला होता. पण घाटामध्ये हा टँकर उलटला. टँकरचा ब्रेकफेल झाल्याने माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ टँकरला अपघात झाला. या अपघातामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला. पेट्रोलच्या टँकरच्या अपघाताची बातमी समजताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.



स्वतःच्या घरातून शक्य होतील ती भांडी घेऊन ते पेट्रोल भरण्यासाठी आले. कुणी पाण्याच्या बाटल्या, कुणी पाण्याचे कॅन, तर कुणी दुधाच्या किटल्या घेऊन आले आणि त्यामध्ये पेट्रोल भरून ते पसार देखील झाले. अपघातानंतर टँकरमधून पेट्रोलची मोठ्या प्रमाणात गळती सुरू होती त्यामुळे माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ रस्त्यावर सगळीकडे पेट्रोल पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच अहिल्यानगर आणि पाथर्डीतून अग्निशमन दलाच्या दोन गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .