Health: सकाळी रिकाम्या पोटी कडिपत्ता खाल्ल्याने दूर होतील हे आजार

  129

मुंबई: कडिपत्त्याचा वापर प्रामुख्याने जेवण करताना फोडणीसाठी केला जातो. मात्र आयुर्वेदाच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने शरीरास अनेक फायदे होतात. नियमितपणे रिकाम्या पोटी कडिपत्त्याचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होऊ शकतात. जाणून घेऊया याचे फायदे...



वजन होते कमी


कडिपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्समुळे शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. तसेच मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. तसेच रिकाम्या पोटी कडिपत्ता खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते.



कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतो.


कडिपत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉल बाहेर निघते.



डोळ्यांचे आरोग्य राहते चांगले


कडिपत्त्यामध्ये व्हिटामिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.



त्वचेचे विकार होतात दूर


कडिपत्त्यामध्ये अँटी बॅक्टेरियल तसेच अँटी फंगल गुण असतात ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात. पिंपल्स, फोड, पुटकळ्या, डाग बरे होतात.


Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी