Health: सकाळी रिकाम्या पोटी कडिपत्ता खाल्ल्याने दूर होतील हे आजार

  164

मुंबई: कडिपत्त्याचा वापर प्रामुख्याने जेवण करताना फोडणीसाठी केला जातो. मात्र आयुर्वेदाच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने शरीरास अनेक फायदे होतात. नियमितपणे रिकाम्या पोटी कडिपत्त्याचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होऊ शकतात. जाणून घेऊया याचे फायदे...



वजन होते कमी


कडिपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्समुळे शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. तसेच मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. तसेच रिकाम्या पोटी कडिपत्ता खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते.



कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतो.


कडिपत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉल बाहेर निघते.



डोळ्यांचे आरोग्य राहते चांगले


कडिपत्त्यामध्ये व्हिटामिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.



त्वचेचे विकार होतात दूर


कडिपत्त्यामध्ये अँटी बॅक्टेरियल तसेच अँटी फंगल गुण असतात ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात. पिंपल्स, फोड, पुटकळ्या, डाग बरे होतात.


Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत