रानबाजिरे येथील वणव्यामुळे जळून खाक झालेला गुरांचा गोठा (छाया-शैलेश पालकर)
पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे परिसरात लागलेल्या वणव्यात येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या वाड्याला आग लागून वाडा पूर्णतः जळून खाक झाला. तर वाड्यातील ३ गुरे होरपळून गतप्राण झाली.
कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सूर्यकांत नथुराम सावंत रा. रानबाजिरे यांच्या मालकीचा गोठा मोरगिरी भागातून वणवा आल्याने आग लागून जळून खाक झाला. या आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महाड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब आणि काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर व सर्व सदस्यानी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तीन गुरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
यावेळी तहसील कार्यालयाचे परशुराम पाटील व तलाठी वैराळे यांनी ग्रामस्थांसमवेत दाखल होत परिसराची पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून कापडे भागात वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे जनावरांचे, वनसंपत्तीचे तसेच ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
यमुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील ३२व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरपर्यंत…
मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.…
मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद अमरावती : विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण केल्यानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त…
मुंबई : नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन…
मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर…
मुंबई : आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र…