Amarnath Yatra 2025 : अमरनाथ यात्रेला ३ जुलै पासून प्रारंभ, बुकिंग सुरु

  111

जम्मू : जगप्रसिद्ध अमरनाथ यात्रेला यंदा ३ जुलै पासून सुरू होत आहे. यासाठी नावनोंदणी प्रक्रिया १४ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. यावर्षी ही यात्रा जवळपास ५२ दिवस चालणार आहे. आगामी ९ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या यात्रेच्या अनुषंगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.


जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ५ मार्च रोजी राजभवन येथे झालेल्या श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या ४८व्या बैठकीत या वर्षीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. यावेळीही यात्रा अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम मार्ग आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावरून एकाच वेळी सुरू होईल. प्रवाशांची अपेक्षित गर्दी लक्षात घेता, मंडळाने यावर्षी व्यवस्था आणि सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याचे प्रस्ताव दिले आहेत.



संपूर्ण भारतातील ५४० हून अधिक अधिकृत बँक शाखांमध्ये वेबसाइट किंवा ऑफलाइन नावनोंदणी सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसाठी १३ ते ७० वयोगटातील भाविक नोंदणी करू शकतात. यामध्ये ६ आठवडे किंवा त्याहून अधिक गर्भवती महिला, आजारी वयोवृद्ध भाविकांना यात्रेसाठी प्रवास करण्याची परवानगी नाही. यात्रेकरूंचा उत्साह आणि सरकारची तयारी पाहता, यावेळी अमरनाथ यात्रा आणखी भव्य आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.




 'या' भाविकांना यात्रेसाठी परवानगी नाही


यंदा ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी १३ ते ७० वयोगटातील भाविक नोंदणी करू शकतात. ६ आठवडे किंवा त्याहून अधिक गर्भवती महिला, आजारी वयोवृद्ध भाविकांना यात्रेसाठी प्रवास करण्याची परवानगी नाही. यात्रेकरूंचा उत्साह आणि सरकारची तयारी पाहता, यावेळी अमरनाथ यात्रा आणखी भव्य आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.


Comments
Add Comment

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे, 

जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर