LSG vs CSK, IPL 2025: धोनीचे नेतृत्व चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून देईल?

मुंबई(ज्ञानेश सावंत): चेन्नई सुपर किंग्ज अजूनही सावरत नाही आहे. गेल्या सामन्यात कोलकत्ताने त्यांचा दारुण पराभव केला. शिवम दुबे व विजय शंकर वगळता एकाही खेळाडूला धावा जमवता आल्या नाहीत. त्यात फिरकीचा प्रभाव जास्त होता. धोनीला आजचा सामना जिंकायचा असेल तर संघात काही बदल करावे लागतील. राहुल त्रिपाठी सतत अपयशी ठरत असेल तर त्याच्या जागेवर दिपक हुडाला संधी देऊन बघायला हवी.


रवींद्र जडेजा सध्या फॉर्ममध्ये नाही आहे, त्याबद्दली सॅम करनला संधी दिली गेली पाहिजे. लखनऊचे मैदान गोलंदाजीला उपयुक्त आहे आणि त्यात फिरकीला साथ देणारे आहे. चेन्नईकडे नूर अहमद व आर अश्विन सारखे गोलंदाज आहेत त्यामुळे आज ते लखनऊ संघाला कमी धावामध्ये रोखू शकतात. चेन्नईला बिश्नोई व दिग्वेज सिंगची फिरकी खेळून काढावी लागेल.


ऋषभ पंतचा संघ सहापैकी चार सामने जिंकून आपले वर्चस्व राखून आहे. त्यांच्या आघाडीच्या फलंदाजाकडून सातत्याने चांगली कामगिरी केली जात आहे. आजचा सामना पूरण विरुद्ध नूर अहमद असा होऊ शकतो कारण ह्या अगोदर नूर अहमदने भल्या-भल्या फलंदाजाना बाद केले आहे. मिचेल मार्श आजच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप माहिती नाही मात्र त्याची गैरहजेरी संघाला नक्कीच डोकेदुखी ठरू शकते. ऋषभ पंतला अजूनही सूर गवसलेला नाही.


चला तर बघू महेंद्रसिंह धोनीची नवीन कर्णधार पदाची खेळी ऋषभ पंतच्या संघाला रोखू शकते का?

Comments
Add Comment

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या