प्रेेमळ राधाबाई

Share

कथा – रमेश तांबे

राधाबाईंचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय होता. गेली वीस-पंचवीस वर्षे चांगल्या मोक्याच्या ठिकाणी त्या भाजीपाला विकायच्या. तीन-चार माणसं तिच्या मदतीला होती. कारण ग्राहकांची गर्दी खूप असायची. सकाळी ९ ते १ आणि संध्याकाळी ४ ते ८ अशा साधारण ८ तास त्या भाजीपाला घेऊन बसायच्या.

राधाबाई स्वभावाने खूप चांगल्या होत्या. त्या गिऱ्हाईकांशी अगदी प्रेमाने बोलत. लोकांसाठी थेट शेतातूनच भाज्या घेऊन यायच्या. त्यासाठी त्यांनी एक छोटेखानी टेम्पोसुद्धा विकत घेतला होता. कमी किंमत, ताजी भाजी शिवाय भाज्यांची विविधता यामुळे त्यांचा व्यवसाय अगदी जोरात होता. आजूबाजूचे भाजीवाले राधाबाईंचा राग राग करायचे. पण राधाबाईंना त्याची फिकीर नसायची. इमाने इतबारे धंदा करावा, गिऱ्हाईकांना देवासमान मानावे, गरजूंना मदत करावी अशी साधी सरळ त्याची जीवन श्रद्धा होती.

पण एक दिवस असा उजाडला की, राधाबाईंचं व्यक्तिमत्त्व अगदी उजळून निघालं. सोन्यासारखं लखलखू लागलं. त्या दिवशी बरोबर ९ च्या सुमारास राधाबाई भाजीपाल्याच्या टोपल्या ओळीने मांडून, देवाची मनोभावे पूजा करून बसल्या. हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. राधाबाईंचा माल झपाट्याने संपू लागला. तेवढ्यात त्यांचं लक्ष दूरवर उभ्या असलेल्या एका आठ-दहा वर्षांच्या मुलाकडे गेलं. गोरापान, स्वच्छ कपडे घातलेला मुलगा त्यांच्या नजरेस पडला. पण तेवढ्यात, “राधाबाई, भोपळा कसा दिला हो?” असा प्रश्न त्यांना गिऱ्हाईकाने विचारताच त्यांचं त्या मुलावरचे लक्ष उडालं. दुपारचा १ वाजत आला होता. तरी तो मुलगा हातात पिशवी घेऊन तिथेच उभा होता. राधाबाईंना कळेना की हा मुलगा इथे का उभा आहे? त्याला भाजी घ्यायची आहे का? की तो गर्दीत हरवला आहे? राधाबाईंच्या मनाची चलबिचल वाढली. त्या जागेवरून उठल्या आणि मुलाजवळ गेल्या.

राधाबाई त्या मुलाच्या समोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “काय रे बाळा, काय हवंय तुला? मी सकाळपासून पाहते आहे तू चार तास उभाच आहेस. हातात पिशवी आणली आहेस. चांगल्या घरातला दिसतोस, काय हवंय तुला? भाजी हवी आहे की घराचा पत्ता तुला आठवत नाहीये.” आता मात्र तो मुलगा घाबरला. तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. राधाबाईंनी अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, “बाळ घाबरू नकोस. बोल, काय हवंय तुला? त्या मुलाने भरल्या डोळ्यांनी राधाबाईंकडे पाहिले आणि म्हणाला, “काकू, तसं काही नाही. नाही विसरलो मी घरी जायला! खरं तर मला घरच नाही. कारण मी अनाथ आश्रमात राहतो. तिथे महिन्यातून एक दिवस प्रत्येकाला भाजी आणायला बाजारात पाठवतात. मीही तसाच आलो. पण आमच्या बाईंनी मला दिलेले पैसे माझ्या पिशवीतून आश्रमातच कुणीतरी चोरले. ती मुलं मला त्रास देण्यासाठी नेहमीच असं करतात. मी आमच्या बाईंना झालेला सर्व प्रकार सांगितला. पण त्या मलाच दोष देऊन मोकळ्या झाल्या. वर दम देत म्हणाल्या, “भाजी घेतल्याशिवाय आश्रमात परत यायचं नाही.” त्यामुळे मला भाजी कोण देणार? हा प्रश्न मला पडलाय.” आता भाजी न घेताच आश्रमात गेलो, तर बेदम मार मिळेल. अगदी दिवसभर उपाशीदेखील ठेवतील. आता मात्र तो ओक्साबोक्शी रडू लागला. राधाबाईंचेही डोळे भरून आले. त्यांनी त्याला जवळ घेतलं. त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवत त्या म्हणाल्या, “बाळ रडू नकोस. मी आहे ना, काकू नाही, आईच समज मला.” हे सारं बोलताना राधाबाई पदराने आपले डोळे पुसत होत्या.

मग राधाबाईंनी मुलाच्या हातातली पिशवी घेतली. त्याला जी भाजी हवी होती ती भाजी अगदी पिशवी भरून दिली. शिवाय इतरही काही भाज्या दुसऱ्या पिशवीत भरून घेतल्या अन् त्या मुलाच्या सोबत आश्रमात गेल्या. “इथून पुढे या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतेय” असं आश्वासन तिथल्या प्रमुखांना देऊन राधाबाई मोठ्या समाधानाने घरी परतल्या.

Recent Posts

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

24 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

58 minutes ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

2 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

9 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

10 hours ago