निसर्गायन - कविता आणि काव्यकोडी

शिलावरण आणि जलावरण
सभोवताली आहे वातावरण
नांदती सौख्यात सारे
सुखी होई पर्यावरण

तपांबर, स्थितांबर, दलांबर
महत्त्वाचे ओझोन आवरण
वायू प्रदूषण वाढता
धोक्यात येई वातावरण

भुरूपाचे शिलावरण
पर्वत, पठार आणि मैदान
जागोजागी झाडे लावून
हिरवाईने नटवू छान

महासागर, सागर,
आखात, खाडी
हे तर सारे जलावरण
दूषित पाणी नदीचे होता
बाधित होई आरोग्यधन

म्हणूनच सारे करू संकल्प
चला वाचवू जंगल, रान
ओसाड उजाड माळावरती
पुन्हा डोलू दे पान न् पान

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) पहाटेला पूर्वेकडून
हा हलकेच येतो
हळूहळू साऱ्या दिशा
लख्ख करत जातो.

दुपारच्या वेळी
दीपवतो डोळे
उगवणे, मावळणे
हे कोणामुळे कळे?

२) झाडाच्या खोडालाच
लटकतो मी फार
वजनदार फळ मी
दंडगोलाकार.

झारखंड म्हणतात
माझ्या आवरणाला
काटेरी अंग माझे
नाव काय बोला?

३) कधी धो-धो कोसळतो
कधी रिमझिम बरसतो
कधीकधी मी अगदी
वेड्यासारखा वागतो

झाडं शेती, रान
मलाच देती मान!
ओळखले का मला
मी फुलवतो पान न पान?

उत्तर -


१) सूर्य
२) फणस
३) पाऊस
Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

एकेकाचे स्वभाव

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाची

समुद्र कसे निर्माण झाले?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे सवंगडी सहलीला गेले असताना दुपारचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत बसले