कुडाळ (सिंधुदुर्ग) : बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडाने महाराष्ट्र हादरलेला असतानाच, कोकणातल्या कुडाळ तालुक्यातील दोन वर्षांपूर्वीच्या एका खून प्रकरणाचा थरारक तपशील उघडकीस आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर या तरुणाचा मार्च २०२३ मध्ये अपहरण करून खून करण्यात आला होता, आणि त्याचा मृतदेह स्मशानात जाळून पुरावा नष्ट करण्यात आला होता.
चेंदवण गावातील नाईकनगरमधील सिद्धिविनायक बिडवलकर (Siddhivinayak Bidwalkar) याला, पैशाच्या वादातून, चार संशयितांनी घरातून जबरदस्तीने कारमध्ये उचलून नेले. कुडाळमध्ये त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण इतकी गंभीर होती की, घटनेच्या ठिकाणीच त्याचा मृत्यू झाला.
मृत्यू झाल्यानंतर, संशयितांनी सावंतवाडीच्या सातार्डा येथील स्मशानभूमीत बिडवलकर याचा मृतदेह जाळून टाकला. हे प्रकरण पोलीस तपासात उघडकीस आले असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.
सिद्धिविनायकचा भाऊ प्रकाश बिडवलकर याने, आपला भाऊ मार्च २०२३ पासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. माधवी चव्हाण या नातेवाईकाच्या तक्रारीवरून, ९ एप्रिल २०२५ रोजी निवती पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा हत्येचा संशय लक्षात घेऊन तपासाचा दिशा बदलला, आणि अखेर दोन वर्षांपूर्वी घडलेला थरारक खून उघडकीस आणला.
पोलिस तपासानुसार, या प्रकरणाचा अनधिकृत दारू व्यवसायातून पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंध आहे. पैशाच्या वादातूनच हा अपहरण आणि खून झाला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका तरुणाच्या प्रकरणाने आज हत्येचा अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आणला आहे. ज्या थंड डोक्याने खून करून मृतदेह जाळून टाकण्यात आला, त्याने कोकणासह राज्यात खळबळ उडवली आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…