मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय दल तैनात; ३ मृत्यू, १२० हून अधिक अटक

कलकत्ता उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय


मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल : वक्फ (सुधारणा) कायद्याविरोधातील सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून १२० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये एक पिता-पुत्र देखील आहे, ज्यांची हत्या त्यांच्या घरी चाकूने वार करून करण्यात आली. घरात लूट देखील झाल्याची माहिती मृतांच्या नातेवाइकांनी दिली आहे.


हिंसाचार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कलकत्ता उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला असून मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अति-संवेदनशील भागांमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांची पथके तात्काळ तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय न्यायमूर्ती सौमेन सेन आणि न्यायमूर्ती राजा बसू चौधुरी यांच्या खंडपीठाने दिला आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी ही मागणी न्यायालयात केली होती.



जाफराबाद आणि सजूरमोर परिसरात मोठ्या प्रमाणावर हल्ले


मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमशेरगंज व सुती भागांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. जाफराबाद आणि सजूरमोर परिसरात मोठ्या प्रमाणावर हल्ले, तोडफोड, आगजनी आणि दुकानांमध्ये लूट झाली. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज केल्यानंतरही जमाव हटला नाही, त्यामुळे चार गोळ्या झाडल्या गेल्या, अशी माहिती ADG (लॉ & ऑर्डर) जावेद शमीम यांनी दिली.


हिंसाचारात १३ पोलीस कर्मचारी आणि २ नागरिक जखमी झाले असून, एक युवक गोळी लागून मरण पावला आहे.




BSF तैनात, इंटरनेट सेवा बंद, कर्फ्यू लागू


परिस्थिती हाताळण्यासाठी बांग्लादेश सीमेला लागून असलेल्या भागात BSF ची तैनाती करण्यात आली आहे. धारा १६३ अंतर्गत कर्फ्यू लागू करण्यात आला असून, इंटरनेट सेवा बंद केली आहे.



मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांची शांततेचे आवाहन


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत सांगितले की, "धर्माच्या नावाखाली अधार्मिक कृती करू नका, समाजात फुट पाडणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होईल." त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं की राज्य सरकार वक्फ (सुधारणा) कायद्याला पाठिंबा देत नाही आणि तो बंगालमध्ये लागू होणार नाही.



भाजपचा सरकारवर हल्लाबोल


विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी न्यायालयाचा आदेश 'लोकशक्तीचा विजय' असल्याचे म्हटले आणि राज्य सरकारवर आरोप करत म्हणाले की, “BSF तैनात असतानाही जिल्हाधिकारी गप्प का बसला?”



पोलीस महासंचालकांचा इशारा


DGP राजीव कुमार यांनी सांगितले की, हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहेत.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.