देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला

नाशिक : नाशिकच्या अंजनेरी येथे डोंगरावर हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाशांच्या हल्ल्यात ८ ते १० भाविक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भाविकांवर अंजनेरीच्या प्राथमिक केंद्रात उपचार करण्यात आले. भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.


हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या एकाने मंदिराच्या पायऱ्यांवर शंखध्वनी केला. या आवाजाने परिसरात असलेली माकडे सैरभैर पळाली. त्यावेळी माकडांचा आसपासच्या मधमाशांच्या पोळ्यांना धक्का लागला आणि मधमाशा उठल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान जयंतीनिमित्त नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत असलेल्या अंजनेरी येथे भाविकांची आज मोठी गर्दी उसळली. सकाळी मंदिराच्या पायऱ्यांवरील मार्गावर कोणीतरी शंखध्वनी केला, ज्याच्या आवाजाने माकडे इकडे तिकडे पळू लागली. त्यावेळी माकडांचा जवळ झाडांवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांना धक्का लागला आणि मधमाशा उठल्या. यानंतर मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला. मधमाशांनी अचानक हल्ल्या केल्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडाला. स्वत:ला मधमाशांपासून वाचवण्यासाठी अनेकजण डोंगरावर इतरत्र आसरा घेऊ लागले. या हल्ल्यात एक दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या भाविकांना डोंगरावरून खाली उतरवण्यात आले. तसेच त्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

Comments
Add Comment

मेट्रो-११ मार्गिकेला मंजुरी

वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचा प्रवास होणार सुलभ मुंबई  : मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होण्यासाठी

शौर्य पाटील मृत्यू प्रकरणी दिल्ली सरकारची चौकशी समिती

सेंट कोलंबस शाळेच्या चार शिक्षिका निलंबित नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीला शिकणारा सांगलीचा १६

चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावात जनआक्रोश!

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाल्याच्या

राज्यभर ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी 'विनामूल्य'!

मुंबई : राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रुग्णालयांसाठी सरकारी जमीन 'महसूल मुक्त'

मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

रत्नागिरी : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने