देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला

  44

नाशिक : नाशिकच्या अंजनेरी येथे डोंगरावर हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाशांच्या हल्ल्यात ८ ते १० भाविक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भाविकांवर अंजनेरीच्या प्राथमिक केंद्रात उपचार करण्यात आले. भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.


हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या एकाने मंदिराच्या पायऱ्यांवर शंखध्वनी केला. या आवाजाने परिसरात असलेली माकडे सैरभैर पळाली. त्यावेळी माकडांचा आसपासच्या मधमाशांच्या पोळ्यांना धक्का लागला आणि मधमाशा उठल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान जयंतीनिमित्त नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत असलेल्या अंजनेरी येथे भाविकांची आज मोठी गर्दी उसळली. सकाळी मंदिराच्या पायऱ्यांवरील मार्गावर कोणीतरी शंखध्वनी केला, ज्याच्या आवाजाने माकडे इकडे तिकडे पळू लागली. त्यावेळी माकडांचा जवळ झाडांवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांना धक्का लागला आणि मधमाशा उठल्या. यानंतर मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला. मधमाशांनी अचानक हल्ल्या केल्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडाला. स्वत:ला मधमाशांपासून वाचवण्यासाठी अनेकजण डोंगरावर इतरत्र आसरा घेऊ लागले. या हल्ल्यात एक दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या भाविकांना डोंगरावरून खाली उतरवण्यात आले. तसेच त्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

Comments
Add Comment

वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात होणार भूमिगत पादचारी मार्ग

मुंबई : बुलेट ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो ३ भुयारी मार्गिकेपर्यंत पोहोचता यावे यासाठी

रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाची जागा एमएमआरडीएच्या ताब्यात

घाटकोपर येथील प्रकल्पास वेग येणार मुंबई : घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास योजनेसाठी घाटकोपर

संपत्तीचे केंद्रीकरण धोकादायक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली चिंता नागपूर : संपत्तीचे केंद्रीकरण धोकादायक असून

पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट!

ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  मुंबई : राज्यातील काही भागांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज आहे.

IND vs ENG: शुभमनची जबरदस्त फटकेबाजी, मोहम्मद-आकाशदीपची कमाल

मुंबई : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. लीड्सच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करूनही

देशातील गरिबीचा दर घसरला

२०११ पासून १७ कोटी भारतीय लोक गरिबीतून आले बाहेर नवी दिल्ली : भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा समान समाज बनला आहे.