Job Opportunity : मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता

  74

मुंबई : तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. मुंबई विद्यापीठात सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पदवीधर, डिप्लोमा केलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत. मुंबई विद्यापीठात एकूण ९४ पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२५ आहे.



कोणत्या पदांसाठी अर्ज करू शकता ?


मुंबई विद्यापीठाने प्रयोगशाळा असिस्टंट, ग्रंथालय सहाय्यक, इलेक्ट्रशियन, सुतार, प्लंबर, चालक, मल्टी टास्क ऑपरेचरसह इतर अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत मुंबई युनिव्हर्सिटीने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.



वरील पदांसाठी काय पात्रता असणे आवश्यक आहे ?


वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.वित्त आणि लेखा सहाय्यक पदासाठी कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. स्टेनोग्राफर पदासाठी कॉमर्समध्ये पदवी, स्टेनोग्राफी प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) पदासाठी संबंधित क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा प्राप्त केलेला असावा. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स) पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. लॉ असिस्टंट पदासाठी कायद्याची पदवी प्राप्त केलेली असावी. प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत टायपिंग, एमएस-सीआयटी प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. इलेक्ट्रिशियन पदासाठी इलेक्ट्रिशियन पदवी प्राप्त केलेली अशावी. मल्टी टास्क ऑपरेटर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी.



ही भरती अप्रेंटिस पदासाठी होणार आहे. त्यामुळे अप्रेंटिसशिपचा कालावधी पूर्ण झाल्यावर नोकरी करण्याचे तुमच्यावर कोणतेही बंधन असणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाने नमूद केले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.