अमरावती : महावीर जयंतीनिमित्त गोमातेसाठी छप्पन भोग

अमरावती : गोमातेची सेवा करणे हे प्रत्येक हिंदू धर्मीयांचे कर्तव्य आहे, असे सांगत येथील जेपीपी जैन महिला फाउंडेशन व जैन संस्था युवा मंचच्या वतीने गोमातेला छप्पन भोग अर्पण करण्यात आला. महाराष्ट्रातील या ऐतिहासिक व अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जैन धर्मगुरू भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम घेण्यात आला.


येथील धर्मदाय कॉटन फंड कमिटीमध्ये जैन धर्मीयांनी गौतम प्रसादीचे आयोजन केले होते. त्याचवेळी गोमातेसाठी छप्पन भोगही अर्पण केला. ३१ क्विंटल सामग्रीपासून बनवलेले विविध मिष्टान्न व इतर पदार्थांचा यात समावेश होता. गोमातेसाठीचे हे भोजन जिल्ह्यातील सर्व गोशाळेत पोहोचवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. या उपक्रमातून महाराष्ट्रात ‘गो वात्सल्य-गो माता सेवे’चा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे आ. सुलभा खोडके, आ. रवी राणा, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अभिनंदन बँकेचे नवीन चोरडिया आदींनी कौतुक केले आहे. संपूर्ण विश्वाला दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली.



जैन धर्मातील परंपरा व संस्कृतीनुसार जेपीपी जैन महिला फाउंडेशन व जैन संस्था युवा मंचच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली होती. भाजीबाजार येथून निघालेली ही फेरी जयस्तंभ चौकात पोहोचल्यानंतर तेथे किर्ती स्तंभाची पूजा करण्यात आली. त्याचवेळी महावीर पाणपोईचे उद्घाटनही करण्यात आले.


अमरावती येथील कार्यक्रमानंतर बडनेरा नवी वस्ती येथील भगवान महावीर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातही आमदार रवी राणा यांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी भगवान महावीर चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी त्यांनी ५ लाख रुपये अनुदान देण्याची घोषणाही केली. आ. रवी राणा यांच्या या घोषणेचे जैन समाजबांधवांनी स्वागत केले.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : पेरणीची घाई करू नका!

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन; खरीप पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत सुविधा केंद्र

Wedding Invitations : बालविवाहाच्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी पावले: लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य

मुंबई : राज्यातील बालविवाहाची (Child Marriage) प्रथा पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या

Vilas Ghule Murder Case: विलास घुले खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, सर्व ९ आरोपी ताब्यात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या (Murder) प्रकरणात

Farmer loan waive : कर्जमाफी अन् अनुदानातील अडथळे दूर होणार; संबंधित विभागांना तातडीने बैठकांचे आदेश

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer loan waive), प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजनांच्या

Raigad Fort : दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग २५ जूनपर्यंत बंद

रायगड : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील (Raigad Fort) महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)