चांगभलंच्या गजरात चैत्र यात्रेला सुरुवात

कोल्हापूर : गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण आणि ‘ज्योतिबाच्या नावाने चांगभल’च्या गजराने दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन सज्ज झाले आहे. दर्शन रांग, पार्किंग आणि अन्नछत्र भक्तांनी गजबजून गेले आहे. संपूर्ण यात्रेवर दोन हजार पोलीस आणि ११५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.


लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. माघ महिन्यात ज्योतिबाचे पाच खेटे मारून झाल्यानंतर चैत्र महिन्यात ज्योतिबाची यात्रा भरते. चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता जोतिबाचा शासकीय महाअभिषेक होतो. साधारण सकाळी नाथांची महावस्त्र आणि अलंकारिक पूजा केली जाते. दुपारी एक ते दीडच्या दरम्यान मुख्य यात्रेचा प्रारंभ होतो.



यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, जोतिबा मंदिरातील सर्व पुजारी आणि मानाच्या सासनकाठ्या यावेळी उपस्थित असतात. परंपरेनुसार उद्या शनिवारी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक होणार आहे. दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.


यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी डोंगरावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचे वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. तसेच १ पोलीस अधीक्षक, २ अपर अधीक्षक, ६ उपअधीक्षक, २५ निरीक्षक, ७० उपनिरीक्षक, महिला पोलीस, वाहतूक पोलीस, शीघ- कृती दल, आरसीपी, होमगार्ड, एसआरपी असे दोन हजारांवर पोलीस तैनात आहेत. जोतिबा डोंगर परिसरात ३४ हून अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलं आहे. सासनकाठीधारकांना स्वतंत्र वाहनतळ आणि स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आलाय. या संपूर्ण मार्गावर वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आलेत.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे