Hanuman Jayanti 2025 Date : कधी आहे हनुमान जयंती ? या दिवशी म्हणावे कोणते मंत्र ?

मुंबई : हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण म्हणून हनुमान जयंती उत्सव ओळखला जातो. हा उत्सव हनुमान जयंतीच्या दिवशी करतात. प्रभू रामाचा निस्सीम भक्त असलेल्या भगवान हनुमानाच्या भक्तीचे प्रतिक म्हणून हनुमान जयंती उत्सव साजरा करतात. भगवान हनुमान अर्थात मारुती हे धैर्य, निःस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतिक आहे. भारतासह जगभरात हनुमान जयंती उत्सव उत्साहाने साजरा करतात.



यंदा शनिवार १२ एप्रिल २०२५ रोजी हनुमान जयंती आहे. या वर्षी १२ एप्रिल रोजी पहाटे ०३:२१ वाजता पौर्णिमा तिथी सुरू होत आहे आणि १३ एप्रिल रोजी पहाटे ०५:५१ वाजता ही तिथी संपत आहे. यामुळे हनुमान जयंती उत्सव हा शनिवार १२ एप्रिल रोजी साजरा केला जाईल.

हिंदू पंचांगानुसार हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता. याच कारणामुळे अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना केली जाते.

हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे. नंतर हनुमान मंदिरात दर्शनासाठी जावे. हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात बसून हनुमान चालीसा म्हणावी. गुळ, खोबरे, केळी असा प्रसाद हनुमान भक्तांना वाटावा आणि स्वतः खावा. अनेक भक्त या दिवशी हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास करतात. तब्येतीला झेपत असल्यास उपवास करावा. हनुमानाची भक्ती केल्याने नकारात्मक उर्जेपासून संरक्षण होते. तनामनात नवी शक्ती आणि उत्साह संचारतो.

हनुमानाचे मंत्र

१. ॐ श्री हनुमते नमः

२. ॐ नमो भगवते हनुमते नमः

३. ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय। सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा
ॐ नमो हनुमंतेश्वर रूपाय अमित विक्रमा प्रकट कार्या महा बलाय सूर्य कोटि समप्रभा
ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा
ॐ ह्रां ह्रीं ह्रं ह्रैं ह्रौं ह्रः॥ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्॥
Comments
Add Comment

एसटीच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (स्वारगेट बस स्थानक) एक विचित्र अपघात झाला. चालक एसटी मागे घेत होता. ही रिव्हर्सची

नेटकरी मलायकावर भडकले! आधीच झाली ट्रोल, त्यात प्रतिक्रिया पण 'बोल्ड'; बघा Video

मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका

जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा- 'ताठ कणा'

मुंबई: 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता, टीम इंडिया पुढील मालिका कुठे खेळणार ?

कोलकाता : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस