ST Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कपात! कर्मचारी संघटनेचा संताप

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employees) पगार नेहमीच रखडला जातो. मात्र आता एस टी कर्मचाऱ्यांना निराश करणारा एक निर्णय प्रशासनाने जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा केवळ ५६ टक्के पगार (ST Employees Salary) मिळणार आहे. पहिल्यांदाच इतका कमी पगार कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेकडून संताप व्यक्त करण्यात आला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी झाल्याचे समोर आले आहे. मात्र, आधीच अपुरा पगार आणि त्यात जर फक्त ५६ टक्के पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र एसटी कर्मचारी सरकारकडे उपस्थित करत आहेत. तसेच सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा आम्ही कोणत्याही क्षणी आंदोलनाची भूमिका घेऊ असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.



एसटी कर्मचाऱ्यांची तक्रार


एस टी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यात २०१८ पासूनचा महागाई भत्ता थकीत आहे. हायकोर्टाचे भत्ता एकरकमी द्या असे आदेश दिले आहेत, तरी कर्मचाऱ्यांचा ५६ टक्के महागाई भत्ता थकीत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार ७ तारखेला होत नाहीत. पगाराची कोणतीही निश्चित तारीख नाही. एसटीचं रोज सरासरी २२ कोटी उत्पन्न म्हणजे महिन्याला ६६० ते ७०० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न आहे. कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारासाठी केवळ ४४० कोटी रुपये लागता. मात्र उत्पन्न ७०० कोटी असूनही पूर्ण पगार आणि जो पगार दिला जातो तोही वेळेवर नाही.  तालुकास्तरावर घरभाडं ८ टक्के असूनही ७ टक्केच दिले जाते, मात्र तेही वेळेवर दिले जात नाही, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य