नेदरलँडच्या रोटर डॅम बंदराला मंत्री नितेश राणेंनी दिली भेट

  47

मुंबई: युरोपमधील सर्वात मोठं बंदर आणि आशियाबाहेरील जगातील सर्वात मोठं बंदर असलेल्या नेदरलँडच्या रोटर डॅम बंदराला महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सीईओ बाउडेविन सायमन्स, बिझनेस हेड मार्क-सायमन बेनजामिन्स, आणि इतर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केलं.


ही भेट महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या (MMB) पथकासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. या भेटीत बंदरातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड शिप बोटी, प्रवासी नौका व त्यांची तांत्रिक क्षमता बारकाईने तपासली, तसेच संपूर्ण पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. रॉटरडॅम बंदराच्या क्षमता वृद्धी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचा विचार करत आहोत, ज्यामुळे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड अधिक कार्यक्षम होईल.


यावेळी एमएमबी चे सीईओ आयएएस पी. प्रदीप, रॉटरडॅमचे शिपिंग तज्ज्ञ श्री. रुट्गर वॅन डॅम, आणि सागरी विभागाचे संचालक श्री. हॅन बर्टले आणि रुलर एन्हान्सर्स चे व्यवस्थापकीय संचालक अंबर आयदे उपस्थित होते. ही भेट सागरी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि ज्ञानसंपन्नतेचा एक महत्वपूर्ण टप्पा ठरली आहे, हे निश्चित.

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये