Mumbai-Goa Highway: विकेंडला कोकणात जाण्याचं ठरवलंय? मुंबई-गोवा मार्गावर ‘ही’ बंदी नक्की वाचा!

महाड : विकेंडला कोकणात जाण्याचा प्लॅन असेल, तर एक अत्यंत महत्त्वाची बातमी लक्षात ठेवा! येत्या १२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या भेटीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) खारपाडा ते कशेडी दरम्यान अवजड वाहनांना वाहतूक बंदी लागू करण्यात आली आहे.



किती वेळ असणार बंदी?


१२ एप्रिलच्या मध्यरात्री १ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गावर जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद असणार आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने – उदा. दूध, पेट्रोल, एलपीजी गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला – यांना या बंदीपासून सूट देण्यात आली आहे. तसेच पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन आणि महिला सशक्तीकरणविषयक वाहनांनाही मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.



कार्यक्रमाचं कारण काय?


रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५ वी पुण्यतिथी मोठ्या अभिवादन सोहळ्याने साजरी होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, तसेच इतर मंत्री व हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही बंदी लागू करण्यात आली आहे.



‘लाँग विकेंड’मुळे मार्गावर होऊ शकते गर्दी


१२ एप्रिल – शनिवार
१३ एप्रिल – रविवार
१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (सार्वजनिक सुटी)


या सलग सुट्यांमुळे अनेक पर्यटक गोव्याकडे किंवा कोकणात जाण्याचा प्लॅन करत आहेत. त्यामुळे या मार्गावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाची पुर्वयोजना करा!


कोकणच्या दिशेने जाण्याआधी ही माहिती शेअर करायला विसरू नका – अन्यथा रस्त्यावर अडकावं लागेल!

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध