Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा केसरी २ चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण

  60

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेला 'केसरी २' चित्रपट शुक्रवार १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने 'केसरी २' चित्रपटाला ए सर्टिफिकेट दिले आहे. जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्रजांविरुद्ध लंडनच्या कोर्टात लढलेली कायदेशीर लढाई या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.



'केसरी चॅप्टर २ : द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग' हा ऐतिहासिक कोर्टरूम ड्रामा आहे. करण सिंग त्यागी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. धर्मा प्रॉडक्शन , लिओ मीडिया कलेक्टिव्ह आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे लेखन करण सिंग त्यागी आणि अमरितपाल सिंग बिंद्रा यांनी केले आहे. चित्रपटाचे संवाद सुमित सक्सेना यांनी लिहिले आहेत. 'द केस दॅट शूक द एम्पायर' या रघू पलट आणि पुष्पा पलट यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित असलेल्या केसरी २ चित्रपटाचे निर्माते हिरू यश जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपूर्व मेहता, अमरितपाल सिंग बिंद्रा हे आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण देबोजीत रे यांनी केले आहे.



'केसरी २' चित्रपटात अक्षय कुमार, आर. माधवन, अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नितीन बैद यांनी चित्रपटाचे एडिटिंग केले आहे. शाश्वत सचदेव यांनी या चित्रपटाला संगीताचा साज चढवला आहे. चित्रपटाचे वितरण धर्मा प्रॉडक्शनने केले आहे. हा १३५ मिनिटांचा हिंदी भाषेतील चित्रपट शुक्रवार १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
Comments
Add Comment

Shefali Jariwala Passes Away: 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाचे हृदयविकाराने निधन

Shefali Jariwala Passes Away due to Cardiac Arrest: 'कांटा लगा' या गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि नृत्यांगना शेफाली जरीवालाचे निधन झाले

विजय देवरकोंडावर होणार पोलीस कारवाई ?

  दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच त्याच्या अनोख्या अंदाजामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेच्या

रश्मिकाच्या या लूकने प्रेक्षक घाबरले; श्रीवल्लीचा उग्र अवतार पाहिला का ?

अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच निरनिराळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येऊन त्यांची मन जिंकते. नॅशनल क्रश असणारी

सावरकरांचं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ पुन्हा रंगमंचावर

मुंबई :'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने नव्या स्वरूपात रंगमंचावर येणार आहे.या

दादरमध्ये सुरांच्या रूपात अवतरणार पंढरपूर

मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वारीच्या निमित्ताने भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. देवाला आळविण्याचा

'त्या गे व्यक्तीने मला नको तिथे स्पर्श केला...', अभिषेक कुमारचा धक्कादायक अनुभव

मुंबई: 'बिग बॉस १७' मुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिषेक कुमारने (Abhishek Kumar) नुकताच कास्टिंग काऊचचा एक धक्कादायक