वाढदिवस साजरा होताना नेहमीच नव्या जबाबदारीची जाणीव होते : खासदार नारायण राणे

उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आ. शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती


रत्नागिरी : वाढदिवस साजरा होत असताना मला नेहमी तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादातून नव्या जबाबदारीची जाणीव होत असते आणि यातूनच नवे काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केले. देवरुख येथील मराठा मंदिर येथे महायुतीच्यावतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते खासदार नारायण राणे बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर सौ. निलमताई राणे, राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.



खा. राणे म्हणाले आजची गर्दी पाहून मी भारावून गेलो आहे. मराठी माणसासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा वयाच्या पंधराव्या वर्षी सदस्य झालो, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला घडवलं, प्रेम दिलं त्यांच्यामुळे राजकारणात महत्त्वाची पदे भूषवली. आजपर्यंत ११ पदांवर काम केले आहे. पण या पदांमुळे जमिनीशी, तुमच्याशी असलेली नाळ तोडली नाही, सत्ता येते आणि जाते त्यामुळे या पदांमुळे माझ्यात फारसा फरक पडला नाही. या पदांपेक्षाही तुम्हा सगळ्यांना भेटलं, तुमच्या सुखदुःखांना जाणून घेतलं, तुमच्याशी प्रेमाने चार शब्द बोललो हीच माझ्यासाठी प्रेरणा आणि ताकद असते, असे खा. राणे म्हणाले.



आज माझ्या वाढदिवसानिमित्त महायुतीचे सर्वच नेते या व्यासपीठावर एकत्र आले आहेत तसंच कोकणच्या विकासासाठी सुद्धा आपण सर्वजण एका व्यासपीठावर येत एकत्रितपणे काम करूया, असं आवाहन सुद्धा खा. राणे यांनी केले. आज तुम्ही सगळेजण मला दादा म्हणता, मान सन्मान देता पण नारायण राणे घडण्यामध्ये तुम्हा सर्वांचे सहकार्याचे हात, तुमचे विचार, साथ सोबत होती म्हणून मी घडत गेलो, हे मी कधीच विसरू शकत नाही असेही खा. राणे यांनी आवर्जून सांगितले. तर रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या अमली पदार्थ व्यापाराचाही त्यांनी आवर्जून उल्लेख करत जिल्ह्याला यातून मुक्त केले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी आपले मनोगत संपवताना केव्हाही कुठल्याही मदतीला मला हाक मारा, मी ओ दिल्याशिवाय राहणार नाही अशी साद सुद्धा त्यांनी उपस्थित सर्वांना दिली. खा राणे यांच्या या प्रत्येक शब्दाला उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त दाद दिली.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Dombilvli: डोंबिवलीत शॉरमावालीच्या स्टॉलवर राज ठाकरेंचा फोटो, अविनाश जाधवांनी दिलेला शब्द पाळला

डोंबिवली: मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी व्यावसायिका

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार मुंबई : महिलांवरील हिंसाचार,

Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात हालचालींना वेग; लवकरच अध्यक्षपदाचा तिढा सुटणार

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.