भाजपा ‘वक्फ दुरुस्ती जागरुकता अभियान’ देशभरात राबवणार

दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यशाळेचे आयोजन


नवी दिल्ली : भाजपा २० एप्रिल ते ५ मे पर्यंत ‘वक्फ दुरुस्ती जागरूकता अभियान’ देशभरात राबवणार आहे. वक्फ दुरुस्ती कायद्यातील सुधारणांच्या फायद्यांची माहिती मुस्लीम समाजाला देणे. वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून जे बोलले जात आहे. त्याविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानाची तयारीसाठी राजधानी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात एका कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यशाळेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजेजू यांनी संबोधित केले.



वक्फ दुरुस्ती कायद्यामुळे वंचित मुस्लिमांचा फायदा होईल. विशेषतः शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात वक्फ मालमत्तेचा अधिक चांगला वापर होईल, असे जे. पी. नड्डा कार्यशाळेत म्हणाले. वक्फ विधेयकाबाबत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे. मुस्लिम समुदायाची दिशाभूल केली आहे, अशी टीका नड्डा यांनी केली.


भाजप कार्यकर्ते मुस्लिम बंधू-भगिनींपर्यंत सक्रियपणे पोहोचतील जेणेकरून विरोधी पक्षांचा खोटेपणा उघड होईल आणि कायद्याचा खरा हेतू आणि फायदे स्पष्ट होतील, असे नड्डा म्हणाले. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी कार्यशाळेत वक्फ सुधारणांबद्दल सविस्तर माहिती दिली. भाजपने प्रत्येक राज्यातील अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षांसह तीन ते चार नेत्यांना या कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. जिल्हास्तरीय भाजप नेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या संबंधित राज्यात अशाच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश या नेत्यांना देण्यात आले आहेत. या अभियानाद्वारे, भाजपचा हेतू वक्फ सुधारणांबद्दलचे सत्य तळागाळातील पातळीपर्यंत पोहोचवणे आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने