Chardham Yatra : एप्रिल महिनाअखेरीस सुरु होणार चारधामचे दर्शन! ‘बद्रीनाथ-केदारनाथ’मध्ये रील्स आणि व्हिडिओ बनवण्यावर बंदी

मंदिर समितीचा मोठा निर्णय


उत्तराखंड : चारधाम यात्रा (Chardham Yatra) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. यापूर्वी, बीकेटीसी (श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती)ने केदारनाथ (Kedarnath) आणि बद्रीनाथ (Badrinath) धाममध्ये व्हीडिओ आणि रिल बनवण्यास बंदी घातली आहे. याअंतर्गत, दोन्ही मंदिरांच्या ३० मीटरच्या परिघात कोणतीही व्यक्ती व्हीडिओ-रील बनवू शकणार नाही. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे.



केदारनाथ आणि बद्रीनाथ धाममध्ये, मोठ्या संख्येने भाविक मंदिराभोवती व्हीडिओ आणि रिल बनवू लागतात. त्यामुळे लोकांना अडचणी येत होत्या. गेल्या वर्षी केदारनाथ धाम संकुलात रिल बनवण्यास पुजाऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. अनेक वेळा येथे वादाच्या परिस्थिती पाहायला मिळाली, ज्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले. म्हणूनच यावेळी चार धाम यात्रेपूर्वी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने विशेष तयारी सुरू केली आहे. जेणेकरून भाविकांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यासाठी मंदिर समिती एक मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करत आहे. यामध्ये आता रील आणि व्हीडिओ करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. (Chardham Yatra 2025)


धार्मिक स्थळांवर व्हीडिओ रील्स (Ban On Reels) इत्यादी बनवणे कितपत योग्य आहे यावर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. बऱ्याच वेळा, माहितीच्या अभावामुळे, आपण इच्छा नसतानाही चुका करतो. आजच्या पिढीसाठी, मंदिरे, मशिदी किंवा तीर्थक्षेत्रे ही फक्त इंस्टाग्राम रीलची पार्श्वभूमी बनली आहेत. शांती आणि ध्यान यांची जागा आता ट्रेंडिंग संगीत आणि स्टायलिश अँगलने घेतली आहे. यामुळे उत्तराखंड प्रशासनाने केदारनाथ धाममध्ये रील्स बनवण्यावर पूर्ण बंदी लादली आहे. कारण स्पष्ट आहे, धार्मिक पावित्र्याचे उल्लंघन आणि शिस्तीचा अवमान रोखण्यासाठी हे पाऊल उचलेल आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे