Chardham Yatra : एप्रिल महिनाअखेरीस सुरु होणार चारधामचे दर्शन! ‘बद्रीनाथ-केदारनाथ’मध्ये रील्स आणि व्हिडिओ बनवण्यावर बंदी

मंदिर समितीचा मोठा निर्णय


उत्तराखंड : चारधाम यात्रा (Chardham Yatra) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. यापूर्वी, बीकेटीसी (श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती)ने केदारनाथ (Kedarnath) आणि बद्रीनाथ (Badrinath) धाममध्ये व्हीडिओ आणि रिल बनवण्यास बंदी घातली आहे. याअंतर्गत, दोन्ही मंदिरांच्या ३० मीटरच्या परिघात कोणतीही व्यक्ती व्हीडिओ-रील बनवू शकणार नाही. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे.



केदारनाथ आणि बद्रीनाथ धाममध्ये, मोठ्या संख्येने भाविक मंदिराभोवती व्हीडिओ आणि रिल बनवू लागतात. त्यामुळे लोकांना अडचणी येत होत्या. गेल्या वर्षी केदारनाथ धाम संकुलात रिल बनवण्यास पुजाऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. अनेक वेळा येथे वादाच्या परिस्थिती पाहायला मिळाली, ज्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले. म्हणूनच यावेळी चार धाम यात्रेपूर्वी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने विशेष तयारी सुरू केली आहे. जेणेकरून भाविकांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यासाठी मंदिर समिती एक मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करत आहे. यामध्ये आता रील आणि व्हीडिओ करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. (Chardham Yatra 2025)


धार्मिक स्थळांवर व्हीडिओ रील्स (Ban On Reels) इत्यादी बनवणे कितपत योग्य आहे यावर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. बऱ्याच वेळा, माहितीच्या अभावामुळे, आपण इच्छा नसतानाही चुका करतो. आजच्या पिढीसाठी, मंदिरे, मशिदी किंवा तीर्थक्षेत्रे ही फक्त इंस्टाग्राम रीलची पार्श्वभूमी बनली आहेत. शांती आणि ध्यान यांची जागा आता ट्रेंडिंग संगीत आणि स्टायलिश अँगलने घेतली आहे. यामुळे उत्तराखंड प्रशासनाने केदारनाथ धाममध्ये रील्स बनवण्यावर पूर्ण बंदी लादली आहे. कारण स्पष्ट आहे, धार्मिक पावित्र्याचे उल्लंघन आणि शिस्तीचा अवमान रोखण्यासाठी हे पाऊल उचलेल आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही