भांडुप आणि कुर्ला परिसरातील ५० महिलांना प्रवासी रिक्षाचे वाटप

  70

महापालिकेच्यावतीने मोफत प्रशिक्षण आणि परवाने देण्यात आले होते


रिक्षांसाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका, केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि टीव्हीएस यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण आणि सर्व प्रकारचे परवाने मोफत देण्यात आले. या ५० महिलांपैकी बहुतांश महिला या भांडूप आणि कुर्ला परिसरातील रहिवासी आहेत.


कुर्ला येथील नेहरू नगरातील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी ८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या ५० रिक्षांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ‘वुमेन्स ऑन व्हिल’ या महत्वाकांक्षी उपक्रम अंतर्गत या रिक्षांचे वितरण करण्यात आले. आमदार मंगेश कुडाळकर, दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर आदींसह महिला बचत गटाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या रिक्षांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला टिव्हीएसचे अधिकारी निशांत दास, अभ्युदय बँकेच्या सहाय्यक महाव्यवस्थापक प्रिती सावंत आदींसह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.


मुंबईतील होतकरू महिलांचे आर्थिक सशक्तीकरणासाठी मुंबई महानगरपालिका महिलांना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. त्यामुळे बचत गटांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो. त्याचाच एक भाग म्हणून आता महिलांना बँकांकडून कमी व्याजदरावर या रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या. या रिक्षांतून महिला प्रवाशी वाहतूक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, आवश्यक परवाने, रिक्षा नोंदणी बिल्ला इत्यादी सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.


या ५० महिलांपैकी बहुतांश महिला या भांडूप आणि कुर्ला परिसरातील रहिवासी आहेत. रिक्षा चालक लाभार्थी सविता तावरे यांनी स्वतः रिक्षा चालवत दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस आणि आमदार मंगेश कुडाळकर यांना छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आणले.


मुंबई महानगरपालिकेकडून या प्रकल्प अंतर्गत महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण तसेच शिकाऊ परवाना, कायमस्वरूपी परवाना, वाहन नोंदणी, परवाना आणि परवाना प्रमाणपत्र (परमिट) या सुविधा मोफत देण्यात आल्या. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे हा आहे. या उपक्रमासाठी नारी शहर समूह, टीव्हीएस मोटर कंपनी आणि सीजी कॉर्पोरेशन यांचे सहकार्य लाभले आहे.

Comments
Add Comment

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना