जीपीओसह कर्नाक बंदरपर्यंतच्या रस्त्यावरील सुमारे २५ अतिक्रमणे महापालिकेने हटवली

फेरीवाल्यांसह वाढीव जागांवरही अतिक्रमण तोडले


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या 'ए' विभागामध्ये साबू सिद्दिक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या सुमारे २५ दुकाने बुधवारी ९ एप्रिल २०२५ रोजी कारवाई करण्यात आली. तसेच मुख्य डाक कार्यालय व सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात वाढीव जागा व्यापून अतिक्रमण केलेल्या दुकाने व फेरीवाल्यांवरही धडक जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.


साबू सिद्दिक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अनधिकृतरित्या व्यवसाय थाटून अतिक्रमण करण्यात आल्याचे ए' विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्यानुसार सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमित व अनधिकृत अशी सुमारे २५ दुकाने निष्कासित करण्याची कार्यवाही बुधवारी पार पाडली. त्यासाठी २ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन), ८ कामगार यांच्यासह १ पोलीस उपनिरीक्षक, ५ पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते. एक जेसीबी, जप्त तसेच निष्कासित साहित्य वाहून नेणारे एक वाहन, एक पोलीस व्हॅन या कारवाईसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते.


तसेच, मुख्य डाक कार्यालयाजवळ सुमारे १२ ते १३ आणि सेंट जॉर्ज रुग्णालयालगतच्या गल्लीत सुमारे २० परवानाप्राप्त व्यावसायिकांनी मंजूर जागेच्या पलीकडे वाढीव जागेवर अतिक्रमण करुन व्यवसाय थाटल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. या दोन्ही ठिकाणीही अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करुन वाढीव जागांवरचे अतिक्रमण हटवून त्यांचे संबंधित साहित्य जप्त केले.

Comments
Add Comment

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मशीद, सँडहर्स्ट रोड आणि काही थांबे रद्द मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार?

शरद पवार गटाकडून हालचालींना सुरुवात मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर, आता सर्वच राजकीय

मुंबईत ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार

महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत.

मतदान अधिक, तरीही एमआयएमपेक्षा मनसेच्या जागा कमी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मिळालेले यश हा चर्चेचा विषय झाला आहे. या

मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार

मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे ‘टीसीएस’कडून जतन

मुंबईतील राजाबाई टॉवर, ग्रंथालय इमारत, वस्तुसंग्रहालयाचे संवर्धन मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व