India vs Bangladesh : भारताने बांगलादेशला दिला जबर झटका

नवी दिल्ली : भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांचा समुद्राशी थेट संपर्क नाही. ही राज्ये समुद्रासाठी बांगलादेशवर अवलंबून आहेत. या भागात चीनला गुंतवणुकीची संधी आहे; अशा स्वरुपाचे वक्तव्य बांग्लादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी केले. चीन दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बांगलादेशची कोंडी करायला सुरुवात केली आहे. याआधी शेख हसिना सरकार असताना भारतीय विमानतळ, बंदर, रेल्वे आणि महामार्ग वापरुन बांगलादेशला आयात - निर्यात व्यापार करायला परवानगी होती. आता ही परवानगी काढून घेण्यात आली आहे. ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिस बंद झाल्यामुळे बांगलादेशच्या आयात - निर्यात व्यापारावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.



भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम विभागाने एक परिपत्रक काढून बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिस बंद केल्याचे जाहीर केले आहे. ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिसची परवानगी देणारे २९ जून २०२० चे परिपत्रक रद्द करण्यात आल्याचे नव्या परिपत्रकात नमूद आहे.



भारताकडून मिळालेल्या ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिसमुळे बांगलादेश आतापर्यंत भूतान, नेपाळ आणि म्यानमार यांच्याशी थेट व्यापार करू शकत होता. हा व्यापार आता अडचणीत सापडणार आहे.
Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत