Ahilyanagar News : शिर्डीत पकडलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा जिल्हा रूग्णालयात मृत्यू

अहिल्यानगर : शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी चार एप्रिल रोजी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी १३ जणांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली. रुग्णालयात दाखल केलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला.



भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचे कारण समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. भिक्षेकऱ्यांवर उपचार करताना हलगर्जीपणा झाला आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.



साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. येणाऱ्या भाविकांमध्ये वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक वर्गांतील भाविक असतात. या भाविकांना सामोरे जाऊन त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी मंदिराच्या आवारात भिक्षेकरी गर्दी करतात. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना भिक्षेकऱ्यांकडून होणारा त्रास वाढत होता. या संदर्भात तक्रारी वाढू लागल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी चार एप्रिल रोजी ताब्यात घेतले. या भिक्षेकऱ्यांमध्ये चार राज्यांतील बारा जिल्ह्यांतील भिक्षेकरी होते. न्यायालयाच्या आदेशानंतर भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली होती. आजारी असलेल्या भिक्षेकऱ्यांना रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातच उपचार घेत असलेल्यांपैकी चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. तपासाअंती कायद्यानुसार दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
Comments
Add Comment

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून