Ahilyanagar News : शिर्डीत पकडलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा जिल्हा रूग्णालयात मृत्यू

अहिल्यानगर : शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी चार एप्रिल रोजी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी १३ जणांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली. रुग्णालयात दाखल केलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला.



भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचे कारण समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. भिक्षेकऱ्यांवर उपचार करताना हलगर्जीपणा झाला आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.



साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. येणाऱ्या भाविकांमध्ये वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक वर्गांतील भाविक असतात. या भाविकांना सामोरे जाऊन त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी मंदिराच्या आवारात भिक्षेकरी गर्दी करतात. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना भिक्षेकऱ्यांकडून होणारा त्रास वाढत होता. या संदर्भात तक्रारी वाढू लागल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी चार एप्रिल रोजी ताब्यात घेतले. या भिक्षेकऱ्यांमध्ये चार राज्यांतील बारा जिल्ह्यांतील भिक्षेकरी होते. न्यायालयाच्या आदेशानंतर भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली होती. आजारी असलेल्या भिक्षेकऱ्यांना रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातच उपचार घेत असलेल्यांपैकी चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. तपासाअंती कायद्यानुसार दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय