मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत ३३ टक्के पाणीसाठा

पाणीसाठा खालावला तरीही प्रकल्प अजूनही कागदावरच


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. त्यात फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी नवीन धरण गेल्या दहा वर्षांत बांधलेले नाही, तर गारगाई धरण, समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा प्रकल्प कागदावरच असून पुढील किमान पाच-सहा वर्षे मुंबईला उन्हाळ्यात पाणीकपातीला सामोरे जावे लागू शकते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणांतील पाणीसाठा ३३.५७ टक्क्यांवर आला आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागला असून हा पाणीसाठा जुलैअखेरीपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने आधीच राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे.


ऊध्वं वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख ३५ दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये ३० हजार २६० दशलक्ष लिटर, तानसामध्ये ३८ हजार ६६० दशलक्ष लिटर, मध्य वैतरणामध्ये ७५ हजार ५८५ दशलक्ष लिटर, भातसामध्ये सर्वाधिक १३ हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा वापर करावा लागणार आहे.


सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७हजार दशलक्ष लिटर आहे. त्या तुलनेत सध्या सात धरणांत मिळून ५ लाख ६६ हजार ५९९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा जास्त असला तरी जुलैअखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आतापासूनच पाण्याचा दाब कमी आहे. त्यामुळे मुंचईच्या अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावते आहे. मनपाचे बोट पाणी गळतीकडे : मनपा अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर म्हणाले की, लोकसंख्येनुसार पाणीसाठा वाढलेला नाही. तसेच पाणीगळतीचे प्रमाणही कमी करण्याची गरज आहे. १३ हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा गारगाई, पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते. गारगाई धरण प्रकल्पासाठी पाच लाख झाडे कापावी लागणार असल्यामुळे मविआ सरकारच्या काळात मनपाने तो बाजूला ठेवला होता. दुसरीकडे समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवणारा प्रकल्पही निविदेच्या पातळीवरच आहे.



सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी


मुंबईकर गेल्या पर्षापासूनय १० ते २० टक्क्यांपर्यंत पाणीकपातीचा सामना करत आहेत. सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी पाहिल्यास अप्पर वैतरणा जलाशयात ९२ हजार ३५ दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये ३० हजार २६० दशलक्ष लिटर, तानसामध्ये ३८ हजार ६६० दशलक्ष लिटर, मध्य वैतरणामध्ये ७५ हजार ५८५ दशलक्ष लिटर, भातसामध्ये सर्वाधिक राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे. ऊध्वं वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख २ लाख ३८ हजार ९५९ दशलक्ष लिटर, विहारमध्ये १२ हजार ३९० दशलक्ष लिटर आणि तुळशीमध्ये सर्वात कमी ३ हजार ५५० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.


Comments
Add Comment

Metro 3 मध्ये मोबाईल नेटवर्कबाबत भेडसावणाऱ्या समस्या दूर होणार

मुंबई : मुंबई मेट्रो रेल मर्यादित (एमएमआरसी) मेट्रो-३ (अॅक्वा लाईन) मार्गिकेवरील मोबाईल नेटवर्क सेवा पुन्हा सुरू

Western Railway : पश्चिम रेल्वे मुंबई आणि गोरखपूर दरम्यान विशेष गाडी चालवणार

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची सोय करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम

CSMT : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वरील ब्लॉकला मुदतवाढ

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ च्या पुनर्विकास आणि

Yuzvendra Chahal : तिला माझ्या आयुष्यातून काढल्यांनतर माझे आयुष्य पूर्णपणे बदललं; हरलीनसमोर युझीने व्यक्त केली मनातली खदखद...

Yuzi Chahal : आयपीएल २०२६ च्या निर्णायक टप्प्यात पंजाब किंग्सचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल पुन्हा चर्चेत आला आहे.

World's Most Expensive Mango : जळगावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पिकवला जगातील महागडा आंबा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर निधीतून नायर रुग्णालयात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अँनालायझर; रुग्णांना जलद व अचूक निदान सेवा मुंबई: मुंबईतील टोपीवाला नॅशनल